शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बाजार समित्या बंद करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय दुर्दैवी : आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:54 IST

शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देणारी व्यवस्था केल्याशिवाय बाजार समित्यांना हात लावू नका, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बाजार समित्यांमुळे हमाल, मापाडींना रोजगार मिळतो. मात्र, केंद्र शासनाने बाजार समित्या बंद करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देणारी व्यवस्था केल्याशिवाय बाजार समित्यांना हात लावू नका, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले.जालना बाजार समिती सभागृहात रविवारी आयोजित हमाल मापाडी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, मराठवाडा लेबर युनियन चे संघटक प्रा. संजय लकडे, श्रमिक मुक्ती दलाचे साथी धनाजी गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. बाजार समितीत कार्यरत मापाड्यांना घरी बसवणारा निर्णय महामंडळाने संघर्ष करून सरकारला बदलायला भाग पाडले. मात्र, आता बाजार समित्या बरखास्तीची टांगती तलवार उभी राहिल्याने, त्या विरुद्ध हमाल - मापाड्यांनी एकजूट करून, हे संकट परतून लावावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी ओंकार अवचारमल, हसन खा नवाज खा, शेख उस्मान शेख गफूर, मोहन जगधने, वैजिनाथ भारती, भास्कर फंडे हमीद खान, मुखतार भाई यांच्यासह हमाल- मापाडी महामंडळाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावMarket Yardमार्केट यार्डLabourकामगारFarmerशेतकरी