शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अपघातात दोन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:35 IST

भरधाव वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : भरधाव वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री बीड- नगर महामार्गावरील नवगण राजुरी जवळ घडली.नंदू भीमराव खोजे (१९), रोहन भरत बळते (१८ दोघे रा. जोगलादेवी ता. घनसावंगी) अशी मयतांची नावे आहेत. घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथील भरत बळते हे नगर जिल्ह्यातील जामखेड येथे कामाला आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्यांचा मुलगा रोहन बळते व नंदू खोजे हे दोघे सोमवारी सायंकाळी दुचाकीवरून जामखेडकडे जात होते. त्यांची दुचाकी बीड- नगर महामार्गावरील नवगण राजुरी जवळ आली असता अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात नंदू खोजे हा जागीच ठार झाला.रोहन बळते यास बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रथमोपचारानंतर त्याला औरंगाबादला नेत असताना गेवराई जवळ त्याचा मृत्यू झाला. तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. जोगलादेवी येथे मंगळवारी दुपारी नंदू खोजे व रोहन बळते यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, पित्याला भेटण्यासाठी जाणाऱ्या मुलासह दोघांवर काळाने घाला घातल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू