शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दोन दिवसाला एक दुचाकी लंपास.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:39 IST

घरफोड्यांनी त्रस्त झालेल्या शहरवासीयांची वाहन चोरांनी झोप उडविली आहे. मागील सहा महिन्यांत जालना शहरातून तब्बल ६५ दुचाकी चोरीस गेल्या आहेत.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरफोड्यांनी त्रस्त झालेल्या शहरवासीयांची वाहन चोरांनी झोप उडविली आहे. मागील सहा महिन्यांत जालना शहरातून तब्बल ६५ दुचाकी चोरीस गेल्या आहेत. यातील केवळ १३ प्रकरणांचा पोलिसांना उलगडा झाला आहे. सरासरी दोन दिवसाला एका दुचाकीची चोरी होत असून, दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभा राहिले आहे.जालना शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह शासकीय कार्यालये, वर्दळीची ठिकाणेच नव्हे तर घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. गाडी चोरून त्याचे स्पेअर पार्ट काढून ते विक्री करण्याची नवी पद्धत सुरु केल्यामुळे या चोरट्यांचा शोध घेणे आव्हान बनले आहे. पोलिसांनी जुनी दुचाकी विक्री करणाऱ्यांना संबंधित वाहनाची कागदपत्रे असल्याशिवाय दुचाकी विक्री करु नये, अशा नोटिसा पाठविल्या आहे. तरीही कागदपत्रे नसलेल्या वाहनांची खरेदी-विक्री करण्याचे प्रकार सुरू असल्याचे बोलले आहे. दुचाकी अल्प किमतीत मिळत असल्याने ग्राहकही चोरट्यांच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे पोलीस तपासात वेळोवेळी समोर आले आहे.पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले :जालना शहरात शेकडो पोलीस रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करतात. या पोलिसांना चकवा देऊन ठिकठिकाणी चोºया होत आहेत. त्यात घरासमोर, पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींमधील पेट्रोल चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. काही वर्षापूर्वी पोलिसांनी पेट्रोल चोरांना जेरबंद केले होते. मात्र, सध्या पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले आहेत.‘जीपीएस’ बसविण्याची गरज शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहन चोरी होत आहे. चोरी झालेल्या वाहनांचे लोकेशन तात्काळ मिळावे, यासाठी वाहनधारकांनी आपापल्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्याची गरज असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.चोरीच्या दुचाकीची जालन्यातच विक्री : उद्योगनगरी म्हणून जालना शहराची ओळख आहे. परंतु, सध्या याच उद्योगनगरीमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकींची चोरी होत आहे. बुलडाणा, परभणी, हिंगोलीसह इतर जिल्ह्यामधून चोरलेल्या दुचाकींची जालना शहरात विक्री होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.या भागात सर्वाधिक चो-या : शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, सिंधी बाजार, शनि मंदिर, शिवाजी पुतळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे दुचाकी लंपास करतात. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीस गेल्या आहेत. वर्दळीच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ची गरज असून शहरातील रेल्वेस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची गर्दी असते. मात्र, रेल्वेस्थानक परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. शिवाय शहरातील महत्त्वाच्या ठिकाणीही ‘सीसीटीव्ही’चा अभाव दिसतो. चोरीच्या घटनांना लगाम घालण्यासाठी आणि चोरट्यांच्या मुस्क्या अवळण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ बसविणे गरजेचे आहे.दुचाकीचे ‘पोस्ट मॉर्टेम’ : चोरटे दुचाकी चोरी करतात. त्यानंतर एखाद्या भंगार विक्रेत्याकडे ती दुचाकी नेली जाते. त्यानंतर त्या दुचाकीचा एक-एक पार्ट काढला जातो. एखाद्या कारखान्याला या दुचाकीच्या पार्टची विक्री केली जाते.

टॅग्स :bikeबाईकtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी