शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

दोन दिवसाला एक दुचाकी लंपास.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:39 IST

घरफोड्यांनी त्रस्त झालेल्या शहरवासीयांची वाहन चोरांनी झोप उडविली आहे. मागील सहा महिन्यांत जालना शहरातून तब्बल ६५ दुचाकी चोरीस गेल्या आहेत.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरफोड्यांनी त्रस्त झालेल्या शहरवासीयांची वाहन चोरांनी झोप उडविली आहे. मागील सहा महिन्यांत जालना शहरातून तब्बल ६५ दुचाकी चोरीस गेल्या आहेत. यातील केवळ १३ प्रकरणांचा पोलिसांना उलगडा झाला आहे. सरासरी दोन दिवसाला एका दुचाकीची चोरी होत असून, दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभा राहिले आहे.जालना शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह शासकीय कार्यालये, वर्दळीची ठिकाणेच नव्हे तर घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. गाडी चोरून त्याचे स्पेअर पार्ट काढून ते विक्री करण्याची नवी पद्धत सुरु केल्यामुळे या चोरट्यांचा शोध घेणे आव्हान बनले आहे. पोलिसांनी जुनी दुचाकी विक्री करणाऱ्यांना संबंधित वाहनाची कागदपत्रे असल्याशिवाय दुचाकी विक्री करु नये, अशा नोटिसा पाठविल्या आहे. तरीही कागदपत्रे नसलेल्या वाहनांची खरेदी-विक्री करण्याचे प्रकार सुरू असल्याचे बोलले आहे. दुचाकी अल्प किमतीत मिळत असल्याने ग्राहकही चोरट्यांच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे पोलीस तपासात वेळोवेळी समोर आले आहे.पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले :जालना शहरात शेकडो पोलीस रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करतात. या पोलिसांना चकवा देऊन ठिकठिकाणी चोºया होत आहेत. त्यात घरासमोर, पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींमधील पेट्रोल चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. काही वर्षापूर्वी पोलिसांनी पेट्रोल चोरांना जेरबंद केले होते. मात्र, सध्या पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले आहेत.‘जीपीएस’ बसविण्याची गरज शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहन चोरी होत आहे. चोरी झालेल्या वाहनांचे लोकेशन तात्काळ मिळावे, यासाठी वाहनधारकांनी आपापल्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्याची गरज असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.चोरीच्या दुचाकीची जालन्यातच विक्री : उद्योगनगरी म्हणून जालना शहराची ओळख आहे. परंतु, सध्या याच उद्योगनगरीमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकींची चोरी होत आहे. बुलडाणा, परभणी, हिंगोलीसह इतर जिल्ह्यामधून चोरलेल्या दुचाकींची जालना शहरात विक्री होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.या भागात सर्वाधिक चो-या : शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, सिंधी बाजार, शनि मंदिर, शिवाजी पुतळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे दुचाकी लंपास करतात. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीस गेल्या आहेत. वर्दळीच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ची गरज असून शहरातील रेल्वेस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची गर्दी असते. मात्र, रेल्वेस्थानक परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. शिवाय शहरातील महत्त्वाच्या ठिकाणीही ‘सीसीटीव्ही’चा अभाव दिसतो. चोरीच्या घटनांना लगाम घालण्यासाठी आणि चोरट्यांच्या मुस्क्या अवळण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ बसविणे गरजेचे आहे.दुचाकीचे ‘पोस्ट मॉर्टेम’ : चोरटे दुचाकी चोरी करतात. त्यानंतर एखाद्या भंगार विक्रेत्याकडे ती दुचाकी नेली जाते. त्यानंतर त्या दुचाकीचा एक-एक पार्ट काढला जातो. एखाद्या कारखान्याला या दुचाकीच्या पार्टची विक्री केली जाते.

टॅग्स :bikeबाईकtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी