शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

दोन दिवसाला एक दुचाकी लंपास.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:39 IST

घरफोड्यांनी त्रस्त झालेल्या शहरवासीयांची वाहन चोरांनी झोप उडविली आहे. मागील सहा महिन्यांत जालना शहरातून तब्बल ६५ दुचाकी चोरीस गेल्या आहेत.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरफोड्यांनी त्रस्त झालेल्या शहरवासीयांची वाहन चोरांनी झोप उडविली आहे. मागील सहा महिन्यांत जालना शहरातून तब्बल ६५ दुचाकी चोरीस गेल्या आहेत. यातील केवळ १३ प्रकरणांचा पोलिसांना उलगडा झाला आहे. सरासरी दोन दिवसाला एका दुचाकीची चोरी होत असून, दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभा राहिले आहे.जालना शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह शासकीय कार्यालये, वर्दळीची ठिकाणेच नव्हे तर घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. गाडी चोरून त्याचे स्पेअर पार्ट काढून ते विक्री करण्याची नवी पद्धत सुरु केल्यामुळे या चोरट्यांचा शोध घेणे आव्हान बनले आहे. पोलिसांनी जुनी दुचाकी विक्री करणाऱ्यांना संबंधित वाहनाची कागदपत्रे असल्याशिवाय दुचाकी विक्री करु नये, अशा नोटिसा पाठविल्या आहे. तरीही कागदपत्रे नसलेल्या वाहनांची खरेदी-विक्री करण्याचे प्रकार सुरू असल्याचे बोलले आहे. दुचाकी अल्प किमतीत मिळत असल्याने ग्राहकही चोरट्यांच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे पोलीस तपासात वेळोवेळी समोर आले आहे.पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले :जालना शहरात शेकडो पोलीस रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करतात. या पोलिसांना चकवा देऊन ठिकठिकाणी चोºया होत आहेत. त्यात घरासमोर, पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींमधील पेट्रोल चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. काही वर्षापूर्वी पोलिसांनी पेट्रोल चोरांना जेरबंद केले होते. मात्र, सध्या पेट्रोल चोरीचे प्रकार वाढले आहेत.‘जीपीएस’ बसविण्याची गरज शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहन चोरी होत आहे. चोरी झालेल्या वाहनांचे लोकेशन तात्काळ मिळावे, यासाठी वाहनधारकांनी आपापल्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्याची गरज असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.चोरीच्या दुचाकीची जालन्यातच विक्री : उद्योगनगरी म्हणून जालना शहराची ओळख आहे. परंतु, सध्या याच उद्योगनगरीमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकींची चोरी होत आहे. बुलडाणा, परभणी, हिंगोलीसह इतर जिल्ह्यामधून चोरलेल्या दुचाकींची जालना शहरात विक्री होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.या भागात सर्वाधिक चो-या : शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, सिंधी बाजार, शनि मंदिर, शिवाजी पुतळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे दुचाकी लंपास करतात. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीस गेल्या आहेत. वर्दळीच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ची गरज असून शहरातील रेल्वेस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची गर्दी असते. मात्र, रेल्वेस्थानक परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. शिवाय शहरातील महत्त्वाच्या ठिकाणीही ‘सीसीटीव्ही’चा अभाव दिसतो. चोरीच्या घटनांना लगाम घालण्यासाठी आणि चोरट्यांच्या मुस्क्या अवळण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ बसविणे गरजेचे आहे.दुचाकीचे ‘पोस्ट मॉर्टेम’ : चोरटे दुचाकी चोरी करतात. त्यानंतर एखाद्या भंगार विक्रेत्याकडे ती दुचाकी नेली जाते. त्यानंतर त्या दुचाकीचा एक-एक पार्ट काढला जातो. एखाद्या कारखान्याला या दुचाकीच्या पार्टची विक्री केली जाते.

टॅग्स :bikeबाईकtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी