शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षात साडेसहा हजार शेततळी मंजूर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:06 IST

राज्य सरकारने शेतक-यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. या योजनेला राज्यासह जालना जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील सिंचनाचे श्रेत्र वाढावे तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळावे, या हेतूने राज्य सरकारने शेतक-यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. या योजनेला राज्यासह जालना जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन वर्षांत योजनेअतंर्गत जिल्ह्यात ६ हजार ४५० शेततळी तयार करण्यात आली.गेल्या काही वर्षापासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती पूर्णत : पावसावर अवलंबून आहे. याचा शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी राज्य सरकारने २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. जलसंधारणच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच सुरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देणे. हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. दरम्यान, सदरील योजनेतंर्गत पारदर्शकता यावी. म्हणून सरकारने इच्छुक शेतक-यांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते.त्यानुसार जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. जिल्ह्यासाठी सरकारने कृषी विभागाला ६ हजार शेतळ््याचे उदीष्ट दिले होते. त्यानुसार मागील दोन वर्षांत ६ हजार ४५० शेततळे कृषी विभागाने शेतक-यांना वाटप केली. तसेच यातील ११८ शेतळ््याची कामे सुरू आहे.यासाठी शासनाकडून २९ लाख १४ हजार ८६ रुपये खर्च करण्यात आले आहे. यात जालना तालुक्यात ११३७, बदनापूर ९८१, भोकरदन १८८६, जाफराबाद ४१५, परतूर ३४८, मंठा २६०, अंबड ९६५, घनसावंगी ५५९, अशी शेततळे तयार करण्यात आले आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी