शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिव्यांगत्वावर मात करीत त्याने सुरु केला मोबाईलचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:40 IST

शंकरनगरमध्ये राहणाऱ्या बळीराम रामभाऊ तिडके या तरुणाने दिव्यांगत्वावर मात करत स्वत : भांडवल उभारुन व्यवसाय सुरु केला. यासाठी त्याला आई-वडिलांचा पाठिंबा लाभला.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील शंकरनगरमध्ये राहणाऱ्या बळीराम रामभाऊ तिडके या तरुणाने दिव्यांगत्वावर मात करत स्वत : भांडवल उभारुन व्यवसाय सुरु केला. यासाठी त्याला आई-वडिलांचा पाठिंबा लाभला.बळीराम तीन महिन्यांचा असताना त्याला तापातच पोलिओ डोस देण्यात आला. यामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. वडिलांना अंधत्व असल्यामुळे आईनेच तिन्ही भावांचा सांभाळ केला. बळीरामने आठवी पर्यंतचे शिक्षण शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील अपंग शाळेत घेतले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण जनता हायस्कूलमध्ये झाले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बळीराम शिक्षण घेत असताना सेतू कार्यालयात उत्पन्न व रहिवासी दाखल्याचे फार्म नागरिकांना भरुन देत असे. त्यातून मिळणारे अर्धे पैसे तो घरी देत होता. तर अर्धे पैसे स्वत: जवळ ठेवत होता. लहानपणापासूनच बळीरामला व्यवसाय करण्याची आवड होती.या पैशातून त्याने पान टपरी टाकली. या व्यवसायातून त्याने भांडवल उभारले. पान टपरीचा व्यवसाय चालत नसल्याने तो शहरातील मोबाईल शॉपवर काम करत होता. वडिलांच्या अंधत्वामुळे बळीरामवरच घरातील व्यक्तींची जबाबदारी होती. त्यामुळे घरची जबाबदारी सांभाळून त्याला व्यवसायासाठी भांडवलही उभारायचे होते. त्यामुळे तो जास्त वेळ कामही करत होता.भांडवल जमा होताच बळीरामने स्वत:चा व्यवसाय सुरु केला असून, त्याला शासनाने कुठल्याही प्रकारचा आधार दिलेला नाही.सध्या त्याने मोबाईल शॉपचे दुकान टाकले आहे. बळीरामाचे वडीलही दृष्टिहीन असतानाही काम करत असतात. त्याला ही उर्जा त्याच्या वडिलांपासून मिळाली आहे.त्यामुळे अहोरात्र परिश्रम घेत असून, त्याला आपल्या व्यवसायात वाढ करायची आहे. बळीराम दिव्यांगत्वावर मात करत मोठ्या जिद्दीने आपल्या व्यवसायात काम करत आहे. व्यवसायात वाढ करण्याची त्याची इच्छा आहे.

टॅग्स :Divyangदिव्यांगSocialसामाजिकbusinessव्यवसाय