शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

थरारक! पेपर देऊन बाहेर येताच व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; ४ कोटींची मागितली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 20:49 IST

व्यापाऱ्याने योग्यवेळी माहिती दिल्याने अवघ्या ५ तासांत पोलिसांनी केली मुलाची सुटका

जालना : ४ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या शहरातील एका व्यापाऱ्याच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पोलिसांनी अवघ्या पाच तासांत सुखरूप सुटका केली. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. स्वयंम महावीर गादिया (१६ रा. श्रीकृष्णनगर, जालना), असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शहरातील श्रीकृष्णनगर येथे राहणारे व्यापारी महावीर गादिया यांचा मुलगा स्वयंम याचा बुधवारी मंठा रोडवरील पोद्दार शाळेत सीबीएसईचा पेपर होता. त्याला सकाळी ९ वाजेच्या सुमारास चालक अक्षय घाडगे (रा. बारसोला, ता. अंबड) याने कारने सोडले होते. पेपर सुटल्यानंतर चालक पुन्हा स्वयंमला आणण्यासाठी गेला. स्वयंम व चालक गाडी घेऊन पोद्दार शाळेच्या बाहेर येताच, चार अज्ञातांनी त्यांची गाडी अडविली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून दोन अपहरणकर्ते गाडीत बसले, तर दोघे जण त्यांच्या स्वत:च्या कारने पुढे जात होते. काही वेळाने अपहरणकर्त्यांनी स्वयंमच्या वडिलांना ड्रायव्हर अक्षय घाडगे याच्या फोनवरून संपर्क करून ४ कोटी रुपयांची खंडणी मागितली व अंबड चौफुली येथे येण्यास सांगितले. 

महावीर गादिया हे नातेवाइकांसह अंबड चौफुली येथे पोहोचले; परंतु अपहरणकर्त्यांनी पुन्हा फोन करून त्यांना अंबडच्या पुढे बोलावले. यानंतर गादिया यांनी पोलिसांना माहिती दिली. तालुका पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्हीची पाहणी केली. काही वेळाने पुन्हा आरोपीने फोन करून वडीगोद्रीजवळील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ बोलावले. एका कारमध्ये एक पोलीस कर्मचारी व महावीर गादिया हे पैसे घेऊन उड्डाणपुलाजवळ थांबले; परंतु अपहरणकर्त्यांना पोलीस असल्याचा संशय आला. त्यामुळे अपहरणकर्ते पुन्हा माघारी गेले.

काही वेळाने स्वयंम गादिया याने फोन करून आम्ही अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटलो असून, शहापूरगावाजवळ असल्याचे तो म्हणाला. पोलिसांनी चालक व स्वयंम याला एका घरात लपून राहण्यास सांगितले. पोलीस शहापूर येथे दाखल झाले. स्वयंमला ताब्यात घेऊन पालकाच्या स्वाधीन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाKidnappingअपहरण