शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

दूध उत्पादकांचे तीन कोटी रुपये थकीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:56 IST

शासनाने दोन महिन्यापासून दूध उत्पादन शेतकऱ्यांचे तब्बल तीन कोटी रुपये थकविल्याने शेतकऱ्यांत संताप आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील ७० गावातील दूध उत्पादक शेतकरी शासकीय दूध संकलन केंद्राला वाजवी दराने दूध विक्री करतात. असे असतानाही शासनाने दोन महिन्यापासून दूध उत्पादन शेतकऱ्यांचे तब्बल तीन कोटी रुपये थकविल्याने शेतकऱ्यांत संताप आहे.जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यातील माहोरा, जालना असे दोन शासकीय दूध संकलन केंद्र आहे. जिल्ह्यातील ७० गावातील दूध उत्पादन शेतकरी २५ रुपये लिटर शासकीय दराने दुधाची विक्री करतात. नियमित २५ ते ३० हजार लिटर दूध संकलित केले जाते. मात्र, जिल्ह्यात सलगच्या दुष्काळामुळे पशुपालकांना दुभती जनावरे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या वर्षी रबी हंगाम वाया गेल्याने पुरेशा प्रमाणात कडब्याचा चारा उपलब्ध झाला नाही. यामुळे पशुपालकांनी विकतचा चारा घेऊन दुभती जनावरे सांभाळली. ज्या शेतक-यांना आर्थिक अडचणी आल्या त्यांनी तर बेभाव दुभत्या जनावरांची नाईलाजाने विक्री केली. असे असताना सुध्दा माहोरा आणि जालना केंद्रातील जामवाडी, गणेशपूर, येवता, आसाई, राजूर, केदारखेडा, वरुड, आदी ७० गावातील पशुपालक शासकीय दूधसंकलन केंद्राला दूध विक्री करतात.असे असताना शेतक-यांना नियमित रकमेचे वाटप होत नसल्याची ओरड शेतक-यांतून होत आहे. दोन महिन्यांचे ३ कोटी रुपये अद्यापही दुग्ध विकास विभागाकडून शेतक-यांना देण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाmilkदूधfundsनिधीFarmerशेतकरी