शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

जालन्यात अवकाळीच्या 'जखमांवर' साडेतीन कोटींचा 'मलम'!

By विजय मुंडे  | Updated: April 17, 2023 20:09 IST

अनुदानास मंजुरी; जालना जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

जालना : मार्च महिन्यात वादळी वारे, अवकाळी पावसामुळे रब्बीतील पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. ३३ टक्क्यांहून अधिक नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासकीय निकषानुसार अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ३ कोटी ६७ लाख ८८ हजार रूपये अनुदान वाटपास शासनाने मंजुरी दिली आहे. हे अनुदान जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांना मिळणार आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीच्या 'जखमांवर' केवळ साडेतीन कोटींचा 'मलम' शासनाने लावल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

गत काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या अनुदानाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील पिके हाताशी आलेली असताना मार्च महिन्यात वादळी वारे, अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. विशेषत: जालना, बदनापूर, जाफराबाद, भोकरदनसह इतर तालुका व परिसरातील रब्बीतील पिके, बागायती क्षेत्रासह फळपिकाला याचा मोठा फटका बसला होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. नुकसानीची तीव्रता पाहता शासनानेही पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

संपकाळात प्रशासकीय यंत्रणेने शेतशिवारात जावून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. प्रशासकीय पंचनाम्यानंतर जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. शिवाय या नुकसानी पोटी ३ कोटी ६७ लाख ८७ हजार ६१५ रूपये अनुदानाची मागणी नोंदविण्यात आली होती. प्रशासकीय पातळवरून अहवाल प्राप्त होताच शासनाने १० एप्रिल रोजी जालना जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ६७ लाख ८८ हजार रूपये अनुदान मंजूर केले आहे.

शेतकऱ्यांचा आक्रोश सुरूचगतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून अनेक मंडळांना वगळण्यात आल्याचा आरोप करीत विविध संघटनांसह शेतकरी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करीत आहेत. त्यात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी किचकट शासकीय नियमांमुळे या नुकसान अनुदानापासून शेतकरी वंचित राहिल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणीही होत आहे.

नुकसानीची अशी होती आकडेवारी (हेक्टरी)तालुका- शेतकरी- जिरायत- बागायत- फळपिके- एकूणजालना- ३७२३- ००-११६८.००- ५९०.००-१७५८.००बदनापूर- २४०- ००-८२.४७-१८.८७- १०१.३४भोकरदन- २६- ००- १७.७०- ००.००- १७.७०जाफराबाद- २२६- ०५.००- ८७.४५- ००.००- ९२.४५परतूर- ००- ००-००-००-००-००-मंठा-००- ००-००-००-००-००-अंबड-००- ००-००-००-००-००-घनसावंगी-००- ००-००-००-००-००-एकूण -४२१५- ५.००- १३५५.६२- ६०८.८७- १९६९.४९

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीRainपाऊस