शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

जालन्यात अवकाळीच्या 'जखमांवर' साडेतीन कोटींचा 'मलम'!

By विजय मुंडे  | Updated: April 17, 2023 20:09 IST

अनुदानास मंजुरी; जालना जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

जालना : मार्च महिन्यात वादळी वारे, अवकाळी पावसामुळे रब्बीतील पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. ३३ टक्क्यांहून अधिक नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासकीय निकषानुसार अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ३ कोटी ६७ लाख ८८ हजार रूपये अनुदान वाटपास शासनाने मंजुरी दिली आहे. हे अनुदान जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांना मिळणार आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीच्या 'जखमांवर' केवळ साडेतीन कोटींचा 'मलम' शासनाने लावल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

गत काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या अनुदानाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील पिके हाताशी आलेली असताना मार्च महिन्यात वादळी वारे, अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. विशेषत: जालना, बदनापूर, जाफराबाद, भोकरदनसह इतर तालुका व परिसरातील रब्बीतील पिके, बागायती क्षेत्रासह फळपिकाला याचा मोठा फटका बसला होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. नुकसानीची तीव्रता पाहता शासनानेही पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

संपकाळात प्रशासकीय यंत्रणेने शेतशिवारात जावून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. प्रशासकीय पंचनाम्यानंतर जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. शिवाय या नुकसानी पोटी ३ कोटी ६७ लाख ८७ हजार ६१५ रूपये अनुदानाची मागणी नोंदविण्यात आली होती. प्रशासकीय पातळवरून अहवाल प्राप्त होताच शासनाने १० एप्रिल रोजी जालना जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ६७ लाख ८८ हजार रूपये अनुदान मंजूर केले आहे.

शेतकऱ्यांचा आक्रोश सुरूचगतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून अनेक मंडळांना वगळण्यात आल्याचा आरोप करीत विविध संघटनांसह शेतकरी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करीत आहेत. त्यात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी किचकट शासकीय नियमांमुळे या नुकसान अनुदानापासून शेतकरी वंचित राहिल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणीही होत आहे.

नुकसानीची अशी होती आकडेवारी (हेक्टरी)तालुका- शेतकरी- जिरायत- बागायत- फळपिके- एकूणजालना- ३७२३- ००-११६८.००- ५९०.००-१७५८.००बदनापूर- २४०- ००-८२.४७-१८.८७- १०१.३४भोकरदन- २६- ००- १७.७०- ००.००- १७.७०जाफराबाद- २२६- ०५.००- ८७.४५- ००.००- ९२.४५परतूर- ००- ००-००-००-००-००-मंठा-००- ००-००-००-००-००-अंबड-००- ००-००-००-००-००-घनसावंगी-००- ००-००-००-००-००-एकूण -४२१५- ५.००- १३५५.६२- ६०८.८७- १९६९.४९

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीRainपाऊस