शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

जालन्यात अवकाळीच्या 'जखमांवर' साडेतीन कोटींचा 'मलम'!

By विजय मुंडे  | Updated: April 17, 2023 20:09 IST

अनुदानास मंजुरी; जालना जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

जालना : मार्च महिन्यात वादळी वारे, अवकाळी पावसामुळे रब्बीतील पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. ३३ टक्क्यांहून अधिक नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासकीय निकषानुसार अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ३ कोटी ६७ लाख ८८ हजार रूपये अनुदान वाटपास शासनाने मंजुरी दिली आहे. हे अनुदान जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांना मिळणार आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीच्या 'जखमांवर' केवळ साडेतीन कोटींचा 'मलम' शासनाने लावल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

गत काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या अनुदानाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील पिके हाताशी आलेली असताना मार्च महिन्यात वादळी वारे, अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. विशेषत: जालना, बदनापूर, जाफराबाद, भोकरदनसह इतर तालुका व परिसरातील रब्बीतील पिके, बागायती क्षेत्रासह फळपिकाला याचा मोठा फटका बसला होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. नुकसानीची तीव्रता पाहता शासनानेही पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

संपकाळात प्रशासकीय यंत्रणेने शेतशिवारात जावून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. प्रशासकीय पंचनाम्यानंतर जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. शिवाय या नुकसानी पोटी ३ कोटी ६७ लाख ८७ हजार ६१५ रूपये अनुदानाची मागणी नोंदविण्यात आली होती. प्रशासकीय पातळवरून अहवाल प्राप्त होताच शासनाने १० एप्रिल रोजी जालना जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ६७ लाख ८८ हजार रूपये अनुदान मंजूर केले आहे.

शेतकऱ्यांचा आक्रोश सुरूचगतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून अनेक मंडळांना वगळण्यात आल्याचा आरोप करीत विविध संघटनांसह शेतकरी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करीत आहेत. त्यात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी किचकट शासकीय नियमांमुळे या नुकसान अनुदानापासून शेतकरी वंचित राहिल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणीही होत आहे.

नुकसानीची अशी होती आकडेवारी (हेक्टरी)तालुका- शेतकरी- जिरायत- बागायत- फळपिके- एकूणजालना- ३७२३- ००-११६८.००- ५९०.००-१७५८.००बदनापूर- २४०- ००-८२.४७-१८.८७- १०१.३४भोकरदन- २६- ००- १७.७०- ००.००- १७.७०जाफराबाद- २२६- ०५.००- ८७.४५- ००.००- ९२.४५परतूर- ००- ००-००-००-००-००-मंठा-००- ००-००-००-००-००-अंबड-००- ००-००-००-००-००-घनसावंगी-००- ००-००-००-००-००-एकूण -४२१५- ५.००- १३५५.६२- ६०८.८७- १९६९.४९

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीRainपाऊस