शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कृत्रिम पावसाचा तिसरा प्रयोग पावला; घनसावंगी तालुक्यात रिमझीम बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:59 IST

जालना , औरंगाबाद : मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग ९ तारखेला सुरु झाला. मंगळवारी प्रयोगाचा बारावा ...

जालना, औरंगाबाद : मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग ९ तारखेला सुरु झाला. मंगळवारी प्रयोगाचा बारावा दिवस होता. या बारा दिवसांत फक्त तीन दिवस विमान प्रयोगासाठी हवेत झेपावले. मंगळवारी विमानाने घनसावंगी परिसरात रसायनांची (एरोसोल्स) फवारणी केली आणि अखेर रिमझिम का होईना पाऊस बरसला. प्रत्यक्ष किती पाऊस झाला याचा अहवाल मात्र रात्रीउशिरापर्यंत विभागीय प्रशासनाकडून मिळाला नाही.९ आॅगस्ट रोजी कृत्रिम पावसासाठी ‘ट्रायल रन’ घेण्यात आले. त्या दिवशी पश्चिम भागासह वैजापूर (जि. औरंगाबाद) परिसरात एका ढगावर फवारणी केली. मात्र, पाऊस झाला नाही. त्यानंतर एकच दिवस प्रयोग झाला. दोन दिवस फवारणीचे विमान विश्रांतीसाठी पुणे आणि दिल्लीला नेण्यात आले. दरम्यान १७ आॅगस्ट रोजी परदेशातून विमान औरंगाबादेत आले. सोमवारी काही परवानग्या न मिळाल्याने विमान उड्डाण घेऊ शकले नाही. रविवारी दिवसभर प्रयोगाबाबत शास्त्रज्ञांनी चर्चा केली.मंगळवारी सी-डॉप्लर रडारवरून मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे उड्डाण घेण्याचा निर्णय झाला. दुपारी पुन्हा बैठक झाल्यानंतर सायंकाळी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात पाणीदार ढग असल्याचे दिसून आले. पाच वाजेच्या सुमारास विमानाने उड्डाण घेत साडेपाच वाजेच्या सुमारास ढगांवर रसायनांची फवारणी केली. ढगावर रसायनांची फवारणी केल्यानंतर १५ मिनिटे ते एक तासाने पाऊस पडतो. त्यानंतर पाऊस पडला की नाही, याची नोंद प्रशासनाकडे झालेली नाही. बुधवारी पाऊस झाला की नाही, याची माहिती मिळेल, असे नोडल आॅफिसर तथा विभागीय उपायुक्त सतीश खडके यांनी सांगितले.घनसावंगी तालुक्यातील रूई, भार्डी खापरदेव हिवरा आणि वडेकाळेगाव परिसरात ग्रामस्थांनी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान हे विमान पाहिले. या विमानाच्या घिरट्यानंतर रिमझिम पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.गेल्या पंधरा दिवसांपासून जालना जिल्ह्यात पावासाने दडी मारली आहे. अर्धा पावसाळा संपल्यावरही सरारीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारकडून मराठवाडा विभागात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी केली होती. परंतु या-ना त्या कारणाने यालाही विलंब होत गेल्याने शेतकऱ्यांच्या या कृत्रिम पावसावरील विश्वासही उडाला होता. मंगळवारी सायंकाळी घनसावंगी तालुक्यातील काही गावांत पाऊस झाल्याने शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेकांनी विमान पाहिलेही परंतु हे विमान कृत्रिम पावसाचेच होते काय याबद्दल शंका होती.यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांना विचारले असता, त्यांनी ते विमान कृत्रिम पावसाचेच असल्याचे सांगितले. आम्हालाही औरंगाबादेतून जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग झाल्याचे सांगण्यात आल्याचे वायाळ म्हणाले.‘त्या’ प्रकरणाची दखलविभागात काही ठिकाणी ढग दाटून येत आहेत. त्यामुळे विमान उड्डाण घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे. कृत्रिम पावसाला यश मिळावे, विभागात पाऊस पडावा, अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे. सोमवारी दिवसभर मराठवाड्यातून आयुक्तालयातील लॅण्डलाईनवर कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी फोन येत होते. सोशल मीडियात एका एसएमएसमुळे हा सगळा प्रकार घडला होता. याप्रकरणाची प्रशासनाने गभीर दखल घेतली आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊस