शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कृषी सेवा केंद्रावर चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:16 IST

आष्टी बसस्थानकापासून जवळच असलेल्या कृषी सेवा केंद्रावर चोरट्यांनी डल्ला मारला.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : मागील काही दिवसांपासून आष्टीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असतानाच शुक्रवारी रात्री पुन्हा आष्टी बसस्थानकापासून जवळच असलेल्या कृषी सेवा केंद्रावर चोरट्यांनी डल्ला मारला. यात २ लाख ३२ हजारांचे बियाणे चोरट्यांनी लंपास केले.मागील काही दिवसांपासून आष्टी परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोऱ्यांचा तपास पोलिसांना अद्यापही लागला नाही. असे असतानाच शुक्रवारी रात्री आष्टी बसस्थानकापासून जवळच असलेल्या राहुल सदाशिव सवादे (३३) यांच्या बालाजी अ‍ॅग्रो सर्व्हिसेस या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी बियाणे लंपास केले आहे.शनिवारी सकाळी आठवाजेच्या सुमारास दुकान उघडले असता, त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी राहुल सवादे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि. विनोद इज्जपवार हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री आष्टीमध्ये वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली. आष्टी व परिसरात यापूर्वीही तीन मोठे दरोडे पडले होते, त्याचाही तपास अद्याप न लागल्याने भीतीचे वातावरण कायम आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीAgriculture Sectorशेती क्षेत्र