शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

"ते खड्ड्यात जाणारं आरक्षण देणार?"; जरांगेंचा इशारा, अधिवेशनाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 09:47 IST

विशेष अधिवेशनाची सुरुवात सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे.

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन मंगळवारी होत असून, या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चर्चा होऊन चर्चेअंती हे विधेयक मंजूर केले जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, आजच्या अधिवेशनात सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा न झाल्यास उद्यापासून आंदोलन काय असतं ते सरकारला कळेल, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

विशेष अधिवेशनाची सुरुवात सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. विधेयकात मराठा समाजाला नोकरीत १२ आणि शिक्षणात १३ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून मिळाली. तर, सगेसोयरे अध्यादेशाबाबत कुठलाही निर्णय होणार नसल्याचेही समजते. त्यातच, जरांगे यांनी आज पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. जे खड्ड्यात जाणारं आरक्षण आहे ते दिलं जातंय. आज घोषणा करुन पहिल्यांदा ते सगेसोयऱ्याचं प्रकरण घ्या. अन्यथा आंदोलनाची आमची पुढची दिशा ठरली आहे. आज यांनी निर्णय न घेतल्यास उद्या आंदोलन सुरूच झालं, असा इशाराही जरांगे यांनी दिला. यावेळी, एसईबीसी आरक्षणातून नोकरी मिळालेल्या पण अद्यापही नियुक्ती न झालेल्या एका युवकांची व्यथाही त्यांनी सांगितली. 

लाखो पोरं बेरोजगार आहेत, कमरेला बेल्ट बांधून फिरायचं, पण आंदोलन करायची वेळ त्यांच्यावर आलीय, आता वयही निघून चाललंय. वाटोळं झालं पोरांचं. आताही हे आरक्षण नाही टिकल्यावर तेच होणार त्यांचं. त्यामुळे, आमची मागणी ही ओबीसीतून आरक्षणाची आहे. तुम्हाला तीन लोकं महत्त्वाचे की ५ कोटी मराठे महत्त्वाचे?, असा सवालही जरांगे यांनी विचारला. 

एसईबीसीतून एका पोराची अधिकारी म्हणून निवड झाली, त्याला गावात वाजत-गाजत नेलं. त्या घटनेला आता साडेचार वर्षे झाली आहेत. ते पोरगं आणखी गावात गेलंच नाही. कारण, गावाकडं सांगितलंय की साहेब झालाय म्हणून. पण, त्याला अजूनही नियुक्तीच मिळाली नाही. जमलेललं लग्नही अजूनही झालं नाही. वाटोळं झालं त्या मागच्या आरक्षणामुळं या पोरांचं, असे म्हणत एसईबीसी आरक्षणातील पीडित युवकाचं उदाहरणही जरांगेंनी दिलं.  

खड्ड्यात जाणरं आरक्षण दिलं जातंय

ओबीसीमध्ये नोंदी सापडल्या आहेत, मग हसत खेळत दिलं पाहिजे.  तुम्ही त्याचं एकट्याचं ऐकता आणि तो विरोधात गेल्यावर आमचं काय होईल असं म्हणता. पण, मराठे तुमच्या विरोधात गेल्यावर मग कसंय?, असे जरांगे यांनी म्हटले. उलट आपल्या नशिबात मराठ्यांच्या नोंदी कुणबीत सापडल्या आहेत. त्यामुळे, सहज दिलं पाहिजे होतं, सरकारला ही संधी आहे समजून आरक्षण दिलं पाहिजे. पण, जे टिकणारं आहे ते देत नाहीत. पण, जे खड्ड्यात जाणारं आहे ते आरक्षण हे द्यायलेत, असे म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. 

ओबीसीतूनच आरक्षण द्या

सरकारला काही घेण देणं नाही. सत्ताधाऱ्यांच्या अंगात रग आणि मगरुरी असेल तर मराठा मराठा आहे. आता, आमची हातं टेकली आहेत. मराठा आम्ही, कुणबी आम्ही आणि ओबीसीपण आम्हीच. म्हणून, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, असेही जरांगे यांनी म्हटले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण