शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई आराखड्यावरून जालना जि.प.ची सभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:51 IST

जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातील नागरिक कामासंर्दभात अधिकाऱ्यांना भेटायला येतात. परंतु, एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नाही. कैलास मशान भूमीत दहा -बारा जण दिसतात. परंतु, जिल्हा परिषदेत कोणीच दिसत नाही.

ठळक मुद्दे...अहो जि.प.ची अवस्था स्मशानभूमी सारखी : स्थायी समितीच्या सदस्यांचा सभेतील सूर

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातील नागरिक कामासंर्दभात अधिकाऱ्यांना भेटायला येतात. परंतु, एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नाही. कैलास मशान भूमीत दहा -बारा जण दिसतात. परंतु, जिल्हा परिषदेत कोणीच दिसत नाही. जिल्हा परिषदेची अवस्थाही मशान भूमीसारखी झाली असल्याचा आरोप सदस्य शालिकराम म्हस्के यांनी सभेत केला. तसेच पाणीपुरवठा विभागाने सदस्यांना न सांगता टंचाई आराखडा तयार करुन जिल्हाधिका-यांकडे पाठवला. परंतु, जिल्हाधिका-यांनी त्या आराखड्यात त्रुटी काढुन तो परत पाठवला. अधिका-यांना कोणत्या गावात किती टँकर सुरु आहे याची माहितीच नसल्याचेही सदस्यांनी सांगितले. गुरुवारी जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा झाली. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, अतिरिक्त कार्यकारी मुख्यधिकारी संतोष धोत्रे, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, सर्व सभापती, स्थायी समिती सदस्य व पदाधिकाºयांची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीलच स्थायी समिती सदस्य शालिकराम म्हस्के यांनी अधिकाºयांच्या उपस्थितीचा मुद्दा उपस्थिती केला. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेचा एकही अधिकारी कार्यालयात हजर राहत नाही. नागरिक कार्यालयात येतात आणि रिकाम्या हाती माघारी जातात. या अधिकाºयांना कार्यालयात राहण्याचे आदेश अध्यक्षांनी द्यावेत. यावर अध्यक्ष खोतकर म्हणाले की, अधिकाºयांने कार्यालयात वेळ द्यावा, याची जबाबदारी अतिरिक्त कार्यकारी मुख्यधिकाºयांनी घ्यावी. अनेक विभागांमध्ये तर अधिकारी, कर्मचारी हे दोघेही नसल्याचे चित्र असते.जालना : सदस्यांना विचारात न घेता आराखडाजिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखडा तयार केला. अधिकाºयांनी सदस्यांना न विचारताच हा आराखडा तयार केला. अधिकाºयांना कोणत्या गावाला किती टँकर लागतात याची माहिती नसते. अधिकाºयाने गावात जाऊन तेथील परिस्थिती पाहाणी केली नाही. त्यामुळे ज्या गावांना टॅकरची गरज आहे. त्या गावांनाच या आराखड्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे नवीन आराखडा सदस्यांना विचारात घेवून तयार करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचाºयांची उपस्थिती होती.उपशावर बंदी घालाजिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने त्वरीत नियोजन करावे. तसेच जेथे पाणी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी होत असलेल्या पाणी उपशावर बंदी घाला, अशी मागणी जि.प. सदस्य आशा पांडे यांनी केली.

टॅग्स :Jalanaजालनाzpजिल्हा परिषदwater shortageपाणीटंचाई