शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई आराखड्यावरून जालना जि.प.ची सभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:51 IST

जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातील नागरिक कामासंर्दभात अधिकाऱ्यांना भेटायला येतात. परंतु, एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नाही. कैलास मशान भूमीत दहा -बारा जण दिसतात. परंतु, जिल्हा परिषदेत कोणीच दिसत नाही.

ठळक मुद्दे...अहो जि.प.ची अवस्था स्मशानभूमी सारखी : स्थायी समितीच्या सदस्यांचा सभेतील सूर

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातील नागरिक कामासंर्दभात अधिकाऱ्यांना भेटायला येतात. परंतु, एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नाही. कैलास मशान भूमीत दहा -बारा जण दिसतात. परंतु, जिल्हा परिषदेत कोणीच दिसत नाही. जिल्हा परिषदेची अवस्थाही मशान भूमीसारखी झाली असल्याचा आरोप सदस्य शालिकराम म्हस्के यांनी सभेत केला. तसेच पाणीपुरवठा विभागाने सदस्यांना न सांगता टंचाई आराखडा तयार करुन जिल्हाधिका-यांकडे पाठवला. परंतु, जिल्हाधिका-यांनी त्या आराखड्यात त्रुटी काढुन तो परत पाठवला. अधिका-यांना कोणत्या गावात किती टँकर सुरु आहे याची माहितीच नसल्याचेही सदस्यांनी सांगितले. गुरुवारी जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा झाली. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, अतिरिक्त कार्यकारी मुख्यधिकारी संतोष धोत्रे, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, सर्व सभापती, स्थायी समिती सदस्य व पदाधिकाºयांची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीलच स्थायी समिती सदस्य शालिकराम म्हस्के यांनी अधिकाºयांच्या उपस्थितीचा मुद्दा उपस्थिती केला. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेचा एकही अधिकारी कार्यालयात हजर राहत नाही. नागरिक कार्यालयात येतात आणि रिकाम्या हाती माघारी जातात. या अधिकाºयांना कार्यालयात राहण्याचे आदेश अध्यक्षांनी द्यावेत. यावर अध्यक्ष खोतकर म्हणाले की, अधिकाºयांने कार्यालयात वेळ द्यावा, याची जबाबदारी अतिरिक्त कार्यकारी मुख्यधिकाºयांनी घ्यावी. अनेक विभागांमध्ये तर अधिकारी, कर्मचारी हे दोघेही नसल्याचे चित्र असते.जालना : सदस्यांना विचारात न घेता आराखडाजिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखडा तयार केला. अधिकाºयांनी सदस्यांना न विचारताच हा आराखडा तयार केला. अधिकाºयांना कोणत्या गावाला किती टँकर लागतात याची माहिती नसते. अधिकाºयाने गावात जाऊन तेथील परिस्थिती पाहाणी केली नाही. त्यामुळे ज्या गावांना टॅकरची गरज आहे. त्या गावांनाच या आराखड्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे नवीन आराखडा सदस्यांना विचारात घेवून तयार करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचाºयांची उपस्थिती होती.उपशावर बंदी घालाजिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने त्वरीत नियोजन करावे. तसेच जेथे पाणी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी होत असलेल्या पाणी उपशावर बंदी घाला, अशी मागणी जि.प. सदस्य आशा पांडे यांनी केली.

टॅग्स :Jalanaजालनाzpजिल्हा परिषदwater shortageपाणीटंचाई