शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पाऊस लांबला, पेरणी खोळंबली; आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने संपवलं जीवन

By विजय मुंडे  | Updated: June 23, 2023 18:50 IST

वेळेवर पेरणी झाली नाही तर उत्पन्न हाती पडणार नाही आणि उत्पन्न मिळाले नाही तर डोक्यावरील कर्जाचा डोंगर फिटणार कसा?

हसनाबाद (जि. जालना) : पैशांची जुळवाजुळव करून शेतीची मशागत केली. बी-बियाण्यांसह खतांचीही खरेदी केली. परंतु, पावसाने मोठी ओढ दिल्याने खरिपाची पेरणी रखडली. वेळेवर पेरणी झाली नाही तर उत्पन्न हाती पडणार नाही आणि उत्पन्न मिळाले नाही तर डोक्यावरील कर्जाचा डोंगर फिटणार कसा, या विवंचनेतून एका ४० वर्षीय शेतकऱ्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी पिंपळगाव कोलते (ता. भोकरदन) शिवारात घडली.

रमेश त्रिंबक सोनवणे (४०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथील रमेश त्रिंबक सोनवणे यांना गावच्या शिवारात चार एकर शेत आहे. रमेश सोनवणे हे गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर घराबाहेर गेले होते. ते रात्री घरी न आल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. शेतातील विहिरीत शुक्रवारी सकाळी रमेश सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

सोनवणे यांनी उसनवारी करून खरिपासाठी शेतीची मशागत केली. खते, बी-बियाण्यांची खरेदी केली. परंतु, जून महिना शेवटच्या टप्प्यात आला तरी पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे वेळेत पेरणी झाली नाही तर उत्पन्न हाती पडणार नाही आणि डोक्यावरील सोसायटीसह खासगी कर्ज फिटणार नाही, याची चिंता त्यांना होती. याच चिंतेतून सोनवणे यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Jalanaजालनाfarmer suicideशेतकरी आत्महत्याCrime Newsगुन्हेगारी