शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

पाऊस लांबला, पेरणी खोळंबली; आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने संपवलं जीवन

By विजय मुंडे  | Updated: June 23, 2023 18:50 IST

वेळेवर पेरणी झाली नाही तर उत्पन्न हाती पडणार नाही आणि उत्पन्न मिळाले नाही तर डोक्यावरील कर्जाचा डोंगर फिटणार कसा?

हसनाबाद (जि. जालना) : पैशांची जुळवाजुळव करून शेतीची मशागत केली. बी-बियाण्यांसह खतांचीही खरेदी केली. परंतु, पावसाने मोठी ओढ दिल्याने खरिपाची पेरणी रखडली. वेळेवर पेरणी झाली नाही तर उत्पन्न हाती पडणार नाही आणि उत्पन्न मिळाले नाही तर डोक्यावरील कर्जाचा डोंगर फिटणार कसा, या विवंचनेतून एका ४० वर्षीय शेतकऱ्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी पिंपळगाव कोलते (ता. भोकरदन) शिवारात घडली.

रमेश त्रिंबक सोनवणे (४०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथील रमेश त्रिंबक सोनवणे यांना गावच्या शिवारात चार एकर शेत आहे. रमेश सोनवणे हे गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर घराबाहेर गेले होते. ते रात्री घरी न आल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. शेतातील विहिरीत शुक्रवारी सकाळी रमेश सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

सोनवणे यांनी उसनवारी करून खरिपासाठी शेतीची मशागत केली. खते, बी-बियाण्यांची खरेदी केली. परंतु, जून महिना शेवटच्या टप्प्यात आला तरी पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे वेळेत पेरणी झाली नाही तर उत्पन्न हाती पडणार नाही आणि डोक्यावरील सोसायटीसह खासगी कर्ज फिटणार नाही, याची चिंता त्यांना होती. याच चिंतेतून सोनवणे यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Jalanaजालनाfarmer suicideशेतकरी आत्महत्याCrime Newsगुन्हेगारी