शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महिला अत्याचाराविरोधात चळवळ अधिक गतिमान करणार : रूपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 17:59 IST

विधवा प्रथा, बालविवाह, लैंगिक, मानसिक अत्याचार याविरोधात ग्रामपातळीवर मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची गरज आहे.

- शेषराव वायाळपरतूर (जालना) : महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनाविरोधी चळवळ गतिमान करून ग्रामपातळीवर बालविवाह प्रतिबंध मोहीम सक्षम करणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शनिवारी त्या परतूर येथे आल्या असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कपिल आकात, वर्षा आकात, विजय राखे, अंकुश तेलगड, माउली लाटे, सय्यद आरीफ अली यांची उपस्थिती होती.

चाकणकर म्हणाल्या, विधवा प्रथा, बालविवाह, लैंगिक, मानसिक अत्याचार याविरोधात ग्रामपातळीवर मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची गरज आहे. यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपातळीवरील सरपंच, सदस्य यांचा सहभाग वाढवावा लागणार आहे. ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण अधिक आढळते. चौदाव्या वर्षाच्या मुलीचे लग्न होऊन पंधराव्या वर्षी गरोदर राहते. मुली अपत्य जन्माला घालण्यास अपरिपक्व असल्याने बाळाला तसेच तिच्या जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे स्तनदा माता, सुदृढ बालक हे स्वप्न साकार होत नाही. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी आणि अशा घटना टाळण्यासाठी सरपंच, सदस्य, कर्मचारी, पालक, विवाह लावणारे पुरोहित यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम उपाययोजना करण्यात येणार आहे. मुलींची छेड किंवा अत्याचार झाल्यास तत्काळ भरोसा सेल, दामिनी पथक व पोलीस यंत्रणेशी संपर्क करावा. महिला आयोग अशा तक्रारींची तत्काळ दखल घेईल, असेही यावेळी चाकणकर यांनी सांगितले. परतूर येथील कार्यक्रमात चाकणकर यांनी महिला व कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी बबन गनगे, योगेश बरकुले, शिवा करपे, सरपंच माउली माटे, उद्धवराव कदम, कैलास मुळे, मुंजाभाऊ वावहळ, कदीर कुरेशी, अखिल काजी, रजाक कुरेशी उपस्थित होते.

टॅग्स :JalanaजालनाRupali Chakankarरुपाली चाकणकर