शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

गावात या; पण २४पर्यंतच; मनोज जरांगे पाटलांचा इशारा, जालन्यात गावबंदीच्या बोर्डावरून राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 09:39 IST

छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील चितेपिंपळ येथे आले होते.

जालना/छत्रपती संभाजीनगर : भोकरदन तालुक्यात मराठा समाजाने लावलेले बोर्ड तोडल्याने आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. बोर्ड तोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास पुढे काय करायचे ते बघून घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. २४ तारखेपर्यंत ज्यांना गावात यायचे आहे, त्यांना येऊ द्या, त्यांना हिंडू, फिरू द्या; पण त्यांचा पाहुणचार करू नका, असेही ते म्हणाले.  

छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील चितेपिंपळ येथे आले होते. यावेळी त्यांच्यावर फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी गाडीच्या टपावर उभे राहूनच लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला एकजुटीचे आवाहन केले. ते म्हणाले की, गावात यायचे असेल तर येऊ द्या; पण बोर्ड फाडून यायचे नाही. इथून पुढे जर प्रवेशबंदीचा बोर्ड फाडला तर महाराष्ट्रातील मराठे आम्ही तुमच्या मागे लागू. आमच्या नादी लागू नका. 

दहा दिवसांनंतर उपोषणस्थळी

वडीगोद्री (जि. जालना) : छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे दहा दिवसांनी रविवारी सायंकाळी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी दाखल झाले. अंतरवालीतील उपोषणस्थळी जरांगे पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच एका घरी लक्ष्मीपूजनही केले. 

‘दिवाळी साजरी करणार नाही’

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक समाजबांधवांनी आत्मबलिदान दिले. देवगाव रंगारी येथे आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना मी भेटून आलो. त्याच्या घरातील परिस्थिती पाहून मन सुन्न झाले. अशा परिस्थितीत आम्ही यंदाची दिवाळी साजरी करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. कोणीही आत्महत्या करू नये, आत्महत्या केल्यास आरक्षण कोणाला द्यायचे, असा सवालही त्यांनी तरुणांना केला.  

बॅनरवरून हाणामारी 

भोकरदन (जि. जालना) : आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी केली असून, या गावबंदीच्या बॅनरवरून बोरगाव जहागीर (ता. भोकरदन) येथे दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून नऊ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याचे फलक गावागावांत लागले आहेत. याच फलकावरून शनिवारी रात्री बोरगाव जहागीर गावात हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले आहेत.

‘भांडणे लावू नयेत’ 

मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची अंबडमध्ये जाहीर सभा नियोजित आहे. यावर जरांगे म्हणाले की, ओबीसी समाजालाच वाटते की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. केवळ ओबीसी नेते मराठा समाजाविरोधात विष पसरवीत आहेत. ओबीसी नेत्यांनी जाती-जातींमध्ये भांडण लावू नये.   

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण