शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मजूरीचे पैसे जमा करून ठेवले, आता ज्ञानराधा सोसायटीच बंद; ठेवीदारांनी सुरू केले उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 17:57 IST

दवाखाना, अडचणीच्या काळासाठी पैसे ठेवले, आता ज्ञानराधा सोसायटीच बंद; ठेवीदारांनी सुरू केले बेमुदत उपोषण

अंबड : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अंबड शाखेत गेल्या तीन महिन्यापासून आर्थिक देवाणघेवाण बंद आहेत. त्यामुळे ठेवीदार आर्थिक संकटात सापडलेले आहेत. ठेवी परत देण्याची मागणी करत ठेवीदारांनी आज सकाळपासून अंबड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या अंबड शाखेत कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. बँक व्यवस्थापनाकडून काही महिन्यापासून ठेवीदारांची आर्थिक कोंडी केली जात असल्याने ठेवीदारांमध्ये संताप निर्माण झाला आहे.ठेवी परत देण्याची मागणी करत ठेवीदारांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शाखा त्वरित सुरू करून रक्कम परत करावी, उपोषण स्थळी आंदोलकांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांचे पासपोर्ट, मालमत्ता जप्त कराव्यात, अशा मागण्या ठेवीदार न्याय हक्क कृती समिती अंबड यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत. 

फसवणूक झाली विधवा मुलीचे शेती विकून आलेले पैसे ठेवले होते. मिळाले नाहीत. क्रेडिट सोसायटी कडून फसवणूक झाली आहे.- समिंद्रा डेरे 

मजुरीचे पैसे होते मोलमजुरी करून जमवलेले पैसे बचत म्हणून बँकेत ठेवले होते. व्याजदराच्या अपेक्षेपोटी गुंतवणूक केली होती. आता पैसे मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणी सापडले आहे.- कासाबाई वराडे

चिंता वाटते दवाखान्यात पैसा उपयोगी येईल या आशेमुळे येथे पैसे ठेवले. आता ठेवी परत मिळत नसल्याने चिंता आहे. - मंडाबाई वराडे 

चिंता वाटत आहे पशुधन विकून आणि बचतीची रक्कम मिळत नसल्याने आता चिंता आहे.- पद्मा रणमळे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना