शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

महायुती घाबरली; निवडणूक कधीही घ्या, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 18:42 IST

पराभवाच्या भीतीनेच महायुती सरकारवरने विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला

भोकरदन: विधानसभा निवडणुका कधीही झाल्या तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल., असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच पराभवाच्या भीतीनेच महायुती सरकारवरने विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आयोजित शिवस्वराज्य रथ यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप भोकरदन येथे करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते. 

भाजपाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा गड असलेल्या भोकरदन येथे रविवारी रात्री शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपा दरम्यान जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, महायुतीचे सरकार निवडणुकींना घाबरत असून त्यामुळेच निवडणुका पुढे लोटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र निवडणुका कधीही घ्या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच असेल. कार्यकर्त्यांनी संयमाने निवडणुकीला सामोरे जावे व बेरजेचे राजकारण करून आपल्या उमेदवारास विजयी करावे, असे आवाहन देखील पाटील यांनी केले.

खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत भोकरदन विधानसभेचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तर माजी पालकमंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांच्या विचारांवर आधारित राजकारण समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देऊ शकते, असे सांगत विरोधकांच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले.

स्थानिक नेत्यांमधील वाद अन् जयंत पाटील संतापलेशिवस्वराज्य यात्रेच्या समरोपा दरम्यान, माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि जाफराबाद नगराध्यक्षा सुरेखा लहाने यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या गोंधळामुळे सभेचे वातावरण तंग झाले होते. यावर जयंत पाटील यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि पक्षाच्या शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले, गोंधळ घालून विरोधकांना मदत होऊ नये, अशीही सूचना दिली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalanaजालना