शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
3
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
4
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
5
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
6
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
7
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
8
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
9
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
10
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
12
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
13
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
14
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
15
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
16
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
17
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
18
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
19
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
20
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:25 IST

"आम्ही मुंबईकरांना सांगू इच्छितो की, आम्ही शांततेत येणार आहोत आणि शांततेतच आरक्षण घेणार आहोत. कुणीही आडवा येऊ दे, आम्ही मुंबईत जाणारच.".

- पवन पवारवडीगोद्री (जालना): मराठा आंदोलक मुंबईत यावेत आणि त्यांच्यात दंगल घडून यावी अशी सरकारचीच इच्छा आहे. सरकारच मराठ्यांच्या अंगावर आग फेकू पाहत आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. शनिवारी अंतरवली सराटी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हा संशय व्यक्त केला.

जरांगे पाटील म्हणाले की, "आम्ही मुंबईकरांना सांगू इच्छितो की, आम्ही शांततेत येणार आहोत आणि शांततेतच आरक्षण घेणार आहोत. कुणीही आडवा येऊ दे, आम्ही मुंबईत जाणारच.". जरांगे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "जेव्हा आम्ही शांततेत अंतरवलीत बसलो होतो, तेव्हा आम्हाला मारहाण करण्यात आली. आमच्यातच रक्तपात घडवला गेला. येवल्याच्या लोकांना हाताशी धरून आमच्यातच भांडणं लावली गेली, मग दंगल घडवण्याचा संशय आम्हाला का येऊ नये?"

सरकारला दंगल घडवायची आहेते पुढे म्हणाले, "मराठ्यांना कळलं आहे की सरकार जाणूनबुजून मराठ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळेच ते संतप्त झाले आहेत. 'पोलिस बघून घेतील' म्हणजे काय? हा दंगल घडवण्याचा दुसरा प्रयत्न नाही तर काय आहे? आम्ही शांततेत मुंबईला येऊ नये का? आझाद मैदानात बसून उपोषण करू नये का?"

'जाळपोळ करणारे आमचे नाहीत'जरांगे पाटील यांनी जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. "हे लोक आमच्यात घुसून घोषणा देतील. त्यांचेच लोक देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देतील. जाळपोळ आणि दगडफेक करणारे आमचे नाहीत. पोलिसांनी त्यांना ताबडतोब पकडावे," असेही जरांगे म्हणाले.

मुंबई न्याय देणारी भूमी"आम्ही न्यायासाठी मुंबईत येत आहोत. उलट, तुम्ही आम्हाला पाणी दिलं पाहिजे. मुंबई ही न्याय देणारी भूमी आहे," असे जरांगे यांनी सांगितले. "२९ ऑगस्टला आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. गणेशोत्सव आपल्या धर्माचा आहे. आम्ही आमच्या लेकरांच्या कल्याणासाठी मुंबईत येत आहोत. मुंबई ही न्याय देणारी भूमी आहे. गणेशोत्सव आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही. आम्ही उत्सवाचा आनंदही घेऊ," असे ते म्हणाले.

सरकारचे लोक काहीही बातम्या पसरवतातते म्हणाले की, आम्ही आमचे गणपती बाप्पा तिथेच आणत आहोत आणि मुंबईकर आणि ग्रामीण महाराष्ट्रातील लोक एकत्र येत असल्याने असा सोहळा जगात कधीच होणार नाही. "आम्ही मराठे हिंदूंचे सगळे संस्कार पाळतो आणि वारकरी संप्रदायाचे पालन करतो. गणेशोत्सव आमच्या मुलांच्या सुखासाठी आहे, आणि आरक्षणही मराठ्यांच्या मुलांच्या सुखासाठी आहे. सरकारचे लोक काहीही बातम्या पसरवतात," असेही जरांगे म्हणाले. मुंबईकरांना प्रश्न विचारताना ते म्हणाले, "आमची काय चूक आहे? आम्ही तुमचीच लेकरं आहोत. गरिबांची लेकरं तुमच्या दाराशी येत आहेत." चार महिन्यांपूर्वी जेव्हा मुंबईला जाण्याची तारीख ठरली, तेव्हा गणेशोत्सव आहे, याची कल्पना नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :JalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMarathwadaमराठवाडाMaratha Reservationमराठा आरक्षण