शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तीर्थपुरीच्या गोदामातूनच सुरु होता बोगस खत विक्रीचा गोरखा धंदा, हजारो बॅगांचा साठा जप्त

By महेश गायकवाड  | Updated: June 20, 2023 16:34 IST

तीर्थपुरी येथील शहागड रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे एक मळ्यात हा प्रकार सुरू होता.

तीर्थपुरी : नामांकित खत उत्पादक कंपन्यांच्या बॅगमध्ये बोगस खत भरण्याचा गाेरखधंदा तीर्थपुरीत सुरू होता. कृषी विभागाच्या पथकाने या गोदामांवर सोमवारी धाड टाकून पाचशेच्यावर बोगस खताच्या बॅगा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे खत निरीक्षक तथा मोहीम अधिकारी नीलेशकुमार भदाने यांच्या तक्रारीवरून गोंदी पोलिस ठाण्यात गणेश आसाराम बोबडे याच्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील शहागड रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे एक मळ्यात हा प्रकार सुरू होता. या ठिकाणी खत साठवणुकीसाठी अनेक गोदामे तयार करण्यात आली होती. कृषी विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत येथील या गोदामात विविध नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये बोगस खत भरण्यात आल्याचे आढळून आले. तसेच या ठिकाणी विविध नामांकित कंपन्यांच्या हजारो रिकाम्या बॅगाचा साठाही आढळून आला आहे. कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत सर्व कंपन्यांच्या बॅगांमध्ये एकाचप्रकारचे बोगस खत असल्याचे दिसून आले. यात भारत सरकार निर्मित किसान या खताच्या बॅगांमध्येही बोगस खत भरण्यात आल्याचे या ठिकाणी आढळून आले. या खताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. बोगस खत आणि बॅगा सील करून येथील साहित्य कोठेही न हलविण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वत:च्या दुकानातून अनेकांना विकले बोगस खतबोगस खत तयार करणारा गणेश बोबडे यांचे तीर्थपुरीत येथील शहागड रोडवर साई एंटरप्राइजेस ॲन्ड ॲग्रो या नावाने कृषी सेवा केंद्र आहे. या दुकानाची तपासणी केली असता, बाेगस खताची विक्री या दुकानातून शेतकऱ्यांना करण्यात आल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रCrime Newsगुन्हेगारीJalanaजालना