शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

महामार्ग पोलिसांकडून दहा हजार चालकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:51 IST

महामार्ग पोलिसांनी चालू वर्षात १० हजार ९४८ वाहन चालकांवर कारवाई करून १५ लाख ७८ हजार रूपयांचा दंड आकारला आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील महामार्ग पोलिसांनी चालू वर्षात १० हजार ९४८ वाहन चालकांवर कारवाई करून १५ लाख ७८ हजार रूपयांचा दंड आकारला आहे. महामार्ग विभागाच्या नव्या अध्यादेशानुसार आता राष्ट्रीय, राज्य महामार्गावर ठरवून दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालविणाऱ्या चालकांवरही धडक कारवाई मोहीम हाती घेतली जाणार आहे.जालना - औरंगाबाद, जालना- अंबड, जालना- देऊळगाव राजा, जालना- मंठा, जालना- सिंदखेडराजा, जालना- भोकरदन या राज्य व जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहने चालविताना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे, याबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते. महामार्ग विभागाच्या वतीने याबाबत नव्याने अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरून वाहने चालविताना कारसाठी प्रति तास ९० किमी., जीप व मालवाहतूक वाहनांसाठी प्रति तास ८० किलोमीटरची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर दुचाकीसाठी प्रति तास ७० किलोमीटरची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर राज्य महामार्गावर कारसाठी प्रति तास ७० किमी., जीप, दुचाकी व मालवाहतूक वाहनासाठी प्रति तास ६० किमीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र, अनेक वाहन चालक वेग मर्यादा ओलांडून वाहने चालवित असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.चालू वर्षात जिल्ह्यातील राज्य मार्गावर ७० प्राणांतिक अपघात झाले आहेत. यात ७९ जणांचा मृत्यू झाला असून, ३६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर प्रवासी गंभीर जखमी झालेले ६६ अपघात आहेत. यात ९६ प्रवासी, चालक गंभीर जखमी झाले आहेत. असे एकूण १३६ अपघात झाले आहेत. वाहतूक नियमांचे विशेषत: वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आता वेगमर्यादा ओलांडणाºया वाहन चालकांविरूध्द कारवाईची धडक मोहीम हाती घेण्याचा निर्धार केला आहे.ब्लॅक फिल्मची ४१ प्रकरणेमहामार्गा पोलिसांनी चालू वर्षात मर्यादेपेक्षा अधिकची ब्लॅक फिल्म बसविणा-या ४१ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तर ओव्हरस्पीड प्रकरणात केवळ चार चालकांवर कारवाई झाली आहे. मात्र महामार्ग विभागाच्या नवीन अध्यादेशानुसार व मिळालेल्या यंत्रणेचा वापर करून वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad transportरस्ते वाहतूकbikeबाईकcarकार