शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

महामार्ग पोलिसांकडून दहा हजार चालकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:51 IST

महामार्ग पोलिसांनी चालू वर्षात १० हजार ९४८ वाहन चालकांवर कारवाई करून १५ लाख ७८ हजार रूपयांचा दंड आकारला आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील महामार्ग पोलिसांनी चालू वर्षात १० हजार ९४८ वाहन चालकांवर कारवाई करून १५ लाख ७८ हजार रूपयांचा दंड आकारला आहे. महामार्ग विभागाच्या नव्या अध्यादेशानुसार आता राष्ट्रीय, राज्य महामार्गावर ठरवून दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालविणाऱ्या चालकांवरही धडक कारवाई मोहीम हाती घेतली जाणार आहे.जालना - औरंगाबाद, जालना- अंबड, जालना- देऊळगाव राजा, जालना- मंठा, जालना- सिंदखेडराजा, जालना- भोकरदन या राज्य व जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहने चालविताना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे, याबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते. महामार्ग विभागाच्या वतीने याबाबत नव्याने अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरून वाहने चालविताना कारसाठी प्रति तास ९० किमी., जीप व मालवाहतूक वाहनांसाठी प्रति तास ८० किलोमीटरची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर दुचाकीसाठी प्रति तास ७० किलोमीटरची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर राज्य महामार्गावर कारसाठी प्रति तास ७० किमी., जीप, दुचाकी व मालवाहतूक वाहनासाठी प्रति तास ६० किमीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र, अनेक वाहन चालक वेग मर्यादा ओलांडून वाहने चालवित असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.चालू वर्षात जिल्ह्यातील राज्य मार्गावर ७० प्राणांतिक अपघात झाले आहेत. यात ७९ जणांचा मृत्यू झाला असून, ३६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर प्रवासी गंभीर जखमी झालेले ६६ अपघात आहेत. यात ९६ प्रवासी, चालक गंभीर जखमी झाले आहेत. असे एकूण १३६ अपघात झाले आहेत. वाहतूक नियमांचे विशेषत: वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आता वेगमर्यादा ओलांडणाºया वाहन चालकांविरूध्द कारवाईची धडक मोहीम हाती घेण्याचा निर्धार केला आहे.ब्लॅक फिल्मची ४१ प्रकरणेमहामार्गा पोलिसांनी चालू वर्षात मर्यादेपेक्षा अधिकची ब्लॅक फिल्म बसविणा-या ४१ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तर ओव्हरस्पीड प्रकरणात केवळ चार चालकांवर कारवाई झाली आहे. मात्र महामार्ग विभागाच्या नवीन अध्यादेशानुसार व मिळालेल्या यंत्रणेचा वापर करून वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad transportरस्ते वाहतूकbikeबाईकcarकार