शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

दहा प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:29 IST

जिल्ह्यातील ६४ पैकी दहा प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील ६४ पैकी दहा प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे. उर्वरित ३७ प्रकल्पात केवळ २७.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध साठा पाहता जालना, भोकरदन तालुक्याचा काही भाग वगळता इतरत्र मात्र मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.गतवर्षी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला होता. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ६४ प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्पांमध्ये ४२.२९ दलघमी म्हणजे २७.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण प्रकल्पांपैकी १० प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पांत मृत पाणीसाठा आहे. हे प्रकल्पही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. १७ प्रकल्पात केवळ २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. १० प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान, ९ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान तर केवळ एका प्रकल्पात ७६ टक्क्याच्या वर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील १४ पैकी सहा कोल्हापुरी बंधाऱ्यांत उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, इतर बंधाऱ्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीकपात