शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

टँकरने गाठला सव्वातीनशेचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:18 IST

ग्रामीण भागाप्रमाणेच जालना शहरातील पाणीबाणी निर्माण झाली आहे. नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळाने जनता हैराण आहे. त्यातच पाणीटंचाईचे भूत डोक्यावर बसले आहे. यामुळे प्रशासनही हवालदिल झाले आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करणे, विहीर अधिग्रहण करणे आदी उपाय करूनही टंचाई कायम आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच जालना शहरातील पाणीबाणी निर्माण झाली आहे. नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे. तर जायकवाडीतून येणाऱ्या पाण्याचे नियोजन करताना पालिकेचे नाकी नऊ येत आहेत.जालना शहरात काही भागात येणारा पाणीपुरवठा हा नियमितपणे होत नसल्याचे नागरिकांनी थेट पालिकेत जाऊन सांगितले. कुठलीही एक ठराविक वेळ आणि ठराविक वार पाणीपुरवठ्यासाठी निश्चित करण्याची गरजही यावेळी व्यक्त केली. मुख्याधिकाऱ्यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले. जुना जालना भागातील भाग्यनगरमध्ये पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याची माहिती या भागातील नागरिक खंदारकर यांनी दिली. तसेच याभागातील हातपंपही आटल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.एक हजार लिटरचे एक टँकर हे सरासरी ३०० रूपयांना विक्री होत आहे. त्यातही त्या पाण्याच्या शुध्दतेवर प्रश्न कायम आहेत.ग्रामीण भागातील पाणी टंचाईने आता रौद्र रूप धारण केले आहे. मार्च संपण्यापूर्वीच टँकरच्या संख्यने ३२५ चा आकडा पार केला आहे. ज्या विहिरींना पाणी आहे,त्या विहिरी अधिग्रहित करून त्यावरून टँकर भरण्यासह ग्रामस्थांना पाणी देण्याची व्यवस्था केली जात आहे.सर्व भिस्त घाणेवाडी जलाशयावरजालना शहराला पूर्वी घाणेवाडी जलाशयातून नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करता येत होता. मात्र, आता या तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावातून आता पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे आता संपूर्ण जालना शहराची भिस्त ही पूर्णपणे जायकवाडीतून होणा-या पाण्यावर अवंलबून आहे. त्यामुळे आता पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना पालिका प्रशासनाचा कस लागणार आहे. असे असले तरी, नागरिकांनी घाबरून न जाता, आम्ही नीट व्यवस्थापन करून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्या संदर्भात नियोजन करणार आहोत.- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा

टॅग्स :water transportजलवाहतूकdroughtदुष्काळJalana Muncipalityजालना नगरपरिषद