शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

टँकरने गाठला सव्वातीनशेचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:18 IST

ग्रामीण भागाप्रमाणेच जालना शहरातील पाणीबाणी निर्माण झाली आहे. नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळाने जनता हैराण आहे. त्यातच पाणीटंचाईचे भूत डोक्यावर बसले आहे. यामुळे प्रशासनही हवालदिल झाले आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करणे, विहीर अधिग्रहण करणे आदी उपाय करूनही टंचाई कायम आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच जालना शहरातील पाणीबाणी निर्माण झाली आहे. नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे. तर जायकवाडीतून येणाऱ्या पाण्याचे नियोजन करताना पालिकेचे नाकी नऊ येत आहेत.जालना शहरात काही भागात येणारा पाणीपुरवठा हा नियमितपणे होत नसल्याचे नागरिकांनी थेट पालिकेत जाऊन सांगितले. कुठलीही एक ठराविक वेळ आणि ठराविक वार पाणीपुरवठ्यासाठी निश्चित करण्याची गरजही यावेळी व्यक्त केली. मुख्याधिकाऱ्यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले. जुना जालना भागातील भाग्यनगरमध्ये पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याची माहिती या भागातील नागरिक खंदारकर यांनी दिली. तसेच याभागातील हातपंपही आटल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.एक हजार लिटरचे एक टँकर हे सरासरी ३०० रूपयांना विक्री होत आहे. त्यातही त्या पाण्याच्या शुध्दतेवर प्रश्न कायम आहेत.ग्रामीण भागातील पाणी टंचाईने आता रौद्र रूप धारण केले आहे. मार्च संपण्यापूर्वीच टँकरच्या संख्यने ३२५ चा आकडा पार केला आहे. ज्या विहिरींना पाणी आहे,त्या विहिरी अधिग्रहित करून त्यावरून टँकर भरण्यासह ग्रामस्थांना पाणी देण्याची व्यवस्था केली जात आहे.सर्व भिस्त घाणेवाडी जलाशयावरजालना शहराला पूर्वी घाणेवाडी जलाशयातून नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करता येत होता. मात्र, आता या तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावातून आता पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे आता संपूर्ण जालना शहराची भिस्त ही पूर्णपणे जायकवाडीतून होणा-या पाण्यावर अवंलबून आहे. त्यामुळे आता पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना पालिका प्रशासनाचा कस लागणार आहे. असे असले तरी, नागरिकांनी घाबरून न जाता, आम्ही नीट व्यवस्थापन करून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्या संदर्भात नियोजन करणार आहोत.- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा

टॅग्स :water transportजलवाहतूकdroughtदुष्काळJalana Muncipalityजालना नगरपरिषद