शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

टँकरने गाठला सव्वातीनशेचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:18 IST

ग्रामीण भागाप्रमाणेच जालना शहरातील पाणीबाणी निर्माण झाली आहे. नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळाने जनता हैराण आहे. त्यातच पाणीटंचाईचे भूत डोक्यावर बसले आहे. यामुळे प्रशासनही हवालदिल झाले आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करणे, विहीर अधिग्रहण करणे आदी उपाय करूनही टंचाई कायम आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच जालना शहरातील पाणीबाणी निर्माण झाली आहे. नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे. तर जायकवाडीतून येणाऱ्या पाण्याचे नियोजन करताना पालिकेचे नाकी नऊ येत आहेत.जालना शहरात काही भागात येणारा पाणीपुरवठा हा नियमितपणे होत नसल्याचे नागरिकांनी थेट पालिकेत जाऊन सांगितले. कुठलीही एक ठराविक वेळ आणि ठराविक वार पाणीपुरवठ्यासाठी निश्चित करण्याची गरजही यावेळी व्यक्त केली. मुख्याधिकाऱ्यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले. जुना जालना भागातील भाग्यनगरमध्ये पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याची माहिती या भागातील नागरिक खंदारकर यांनी दिली. तसेच याभागातील हातपंपही आटल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.एक हजार लिटरचे एक टँकर हे सरासरी ३०० रूपयांना विक्री होत आहे. त्यातही त्या पाण्याच्या शुध्दतेवर प्रश्न कायम आहेत.ग्रामीण भागातील पाणी टंचाईने आता रौद्र रूप धारण केले आहे. मार्च संपण्यापूर्वीच टँकरच्या संख्यने ३२५ चा आकडा पार केला आहे. ज्या विहिरींना पाणी आहे,त्या विहिरी अधिग्रहित करून त्यावरून टँकर भरण्यासह ग्रामस्थांना पाणी देण्याची व्यवस्था केली जात आहे.सर्व भिस्त घाणेवाडी जलाशयावरजालना शहराला पूर्वी घाणेवाडी जलाशयातून नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करता येत होता. मात्र, आता या तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावातून आता पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे आता संपूर्ण जालना शहराची भिस्त ही पूर्णपणे जायकवाडीतून होणा-या पाण्यावर अवंलबून आहे. त्यामुळे आता पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना पालिका प्रशासनाचा कस लागणार आहे. असे असले तरी, नागरिकांनी घाबरून न जाता, आम्ही नीट व्यवस्थापन करून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्या संदर्भात नियोजन करणार आहोत.- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा

टॅग्स :water transportजलवाहतूकdroughtदुष्काळJalana Muncipalityजालना नगरपरिषद