शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार
2
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
3
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
4
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
5
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
6
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
7
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
8
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
9
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
10
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
11
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
12
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
13
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
14
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
15
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
16
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
17
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
18
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...
19
एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

जालना ते औरंगाबाद मार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा : एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

गेल्या काही महिन्यांमध्ये जालना ते औरंगाबाद मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचा आधार ...

गेल्या काही महिन्यांमध्ये जालना ते औरंगाबाद मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचा आधार हरपला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कंटेनरने दोन युवकांना चिरडले. त्यातील दाेन्ही तरुण हे गरीब घरातील होते. काम-धंदा करून उदरनिर्वाह करत; परंतु अपघातात त्यांचा बळी गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.

ही बाब गंभीर असून, याची दखल युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकरांनी घेतली.

त्यांनी बुधवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तसेच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी तातडीने याची दखल घेऊन आयआरबी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सूचना दिल्या. त्यात प्रामुख्याने जालना ते औरंगाबाद मार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे, अनेक महत्त्वपूर्ण वळणांवर सीसीटीव्हीचे कॅमेरे बसविणे, पोलिसांची पेट्रोलिंग वाढविणे, आदी सूचना दिल्या. तसेच या सचूनांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देशही दिले.

आमचे कार्यकर्ते हळहळले

जालना तालुक्यातील दावलवाडी येथील दोन युवक हे मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना एका कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. ते युवा सेनेचे कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. ही बाब मनाला न पटल्याने आपण तातडीने युवासेनेचे संस्थापक तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. त्यांनी लगेचच याची दखल घेतल्याने आता अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

अभिमन्यू खोतकर, युवा सेनेचे राज्य विस्तारक