शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

जालना ते औरंगाबाद मार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा : एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

गेल्या काही महिन्यांमध्ये जालना ते औरंगाबाद मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचा आधार ...

गेल्या काही महिन्यांमध्ये जालना ते औरंगाबाद मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचा आधार हरपला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कंटेनरने दोन युवकांना चिरडले. त्यातील दाेन्ही तरुण हे गरीब घरातील होते. काम-धंदा करून उदरनिर्वाह करत; परंतु अपघातात त्यांचा बळी गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.

ही बाब गंभीर असून, याची दखल युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकरांनी घेतली.

त्यांनी बुधवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तसेच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी तातडीने याची दखल घेऊन आयआरबी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सूचना दिल्या. त्यात प्रामुख्याने जालना ते औरंगाबाद मार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे, अनेक महत्त्वपूर्ण वळणांवर सीसीटीव्हीचे कॅमेरे बसविणे, पोलिसांची पेट्रोलिंग वाढविणे, आदी सूचना दिल्या. तसेच या सचूनांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देशही दिले.

आमचे कार्यकर्ते हळहळले

जालना तालुक्यातील दावलवाडी येथील दोन युवक हे मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना एका कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. ते युवा सेनेचे कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. ही बाब मनाला न पटल्याने आपण तातडीने युवासेनेचे संस्थापक तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. त्यांनी लगेचच याची दखल घेतल्याने आता अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

अभिमन्यू खोतकर, युवा सेनेचे राज्य विस्तारक