शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

दोषारोपपत्र दाखल करताना खबरदारी घ्या- रजनीश सेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:52 AM

दोषारोपपत्र दाखल करताना ते कायद्याच्या दृष्टीने कसे टिकेल, याची काळजी कशी घ्यावी या बद्दल आपण अधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अनेक प्रकरणांमध्ये आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात त्याला होणाऱ्या शिक्षेचे प्रमाण हे सध्या पाहिजे तेवढे नाही. हे प्रमाण वाढविण्यासाठी ज्यावेळी न्यायालयात संबंधित आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल करताना ते कायद्याच्या दृष्टीने कसे टिकेल, गुन्ह्यातील साक्षीदार फितूर कसे होणार नाहीत, याची काळजी कशी घ्यावी या बद्दल आपण दोन दिवसांच्या तपासणी कार्यक्रमा अंतर्गत अधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना दिले.गेल्या दोन दिवसांपासून सेठ यांनी जालना पोलिसांचा सूक्ष्म आढावा घेतला. तसेच त्यांना आगामी काळात घ्यावयाची काळजी या संदर्भात सूचना दिल्याचे ते म्हणाले. विधासभा निवडणुका, बकरी ईद, गणेश उत्सव, नवरात्र आदी सणवार येणार आहेत. ते शांततेत पार पडावेत म्हणून समाजातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना प्रतिबंधित करणे, यासह त्या काळात साध्या वेशात पोलिसांना ठेवून समाजात काय चालले आहे, याचा आढावा घेणार आहोत. कुठल्याही स्थितीत कायदा मोडणा-यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा सेठ यांनी दिला.जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा सुरू असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाशी समन्वय ठेवण्याचे निर्देशही सेठ यांनी उपस्थित पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आणि पोलीस अधीक्षक चैतन्य एस. यांना दिले. यापूर्वीही वाळू तस्करांवर कारवाई केल्याचे पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली. जालना जिल्ह्यातील दहा पोलीस ठाण्याचे प्रस्ताव गेल्या कित्येक वर्षापासून धूळ खात पडून असल्याबद्दल त्यांना विचारले असता, ते म्हणाले की, लवकरच हे प्रस्ताव मंजुरीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.आगामी सहा महिने महत्त्वाचे : सर्वांनी कायद्याचे पालन करावेआगामी सहा महिने हे पोलिसांसाठी ज्या प्रमाणे महत्त्वाचे आहेत, त्याच प्रमाणे ते जनतेसाठी देखील महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सणवार, निवडणुकांच्या काळात नागरिकांनी कायद्याचे पालन केल्यास कुठलेच प्रश्न निर्माण होणार नाहीत.परंतु या काळात जर कोणी मुद्दामहून कायद्याचे उल्लंघन करत असतील तर त्यांची गंभीर दखल पोलिसांकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे कायदा पाळून समाजातील शांतता अबाधित ठेवण्यावर पोलिसांचा भर राहील, असे सेठ यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसJalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाCourtन्यायालय