शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:13 IST

घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव या गावाची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेमध्ये झाली असून, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे घनसावंगी तालुका कृषी विभागाचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस. बी. ढगे यांनी राणीउंचेगाव येथे आयोजित ग्रामसभेत शेतक-यांना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कराणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव या गावाची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेमध्ये झाली असून, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे घनसावंगी तालुका कृषी विभागाचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस. बी. ढगे यांनी राणीउंचेगाव येथे आयोजित ग्रामसभेत शेतक-यांना सांगितले.जालना जिल्ह्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनमध्ये ३६३ गावांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये घनसावंगी तालुक्यामध्ये ४८ गावांची निवड झालेली आहे.तालुक्यातील ११ गावामध्ये पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये राणीउंचेगावची निवड झालेली आहे.नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये गावक-यांचा सहभाग महत्वाचा आहे. या योजनेमध्ये जलसंधारणाची १०० टक्के कामे अनुदानावर करण्यात येणार आहे. तर वैयक्तिक लाभाची ५० ते ६० टक्के कामे अनुदानावर करता येणार आहे.नाला सरळीकरण, शेततळे पन्नीसह, सिमेंट बंधारे, जमीन सुधारणाची कामे, तर वैयक्तिक लाभाच्या कामामध्ये विहीर, डिझेल इंजीन, पाईप, तुषार सिंचन, शेतमालाची वाहतूक करण्यासाठी वाहन, शेतमालाच्या साठवणुकीसाठी गोदामे, शेळीपालन, कुक्कूटपालन तसेच फळबाग लागवड करणे ही कामे करता येणार आहेत. गावामधील शेतमजूर, भूमिहीन व्यक्ती, महिला बचत गटांना कृषी उद्योगात्मक व्यवसाय करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. तसेच अपंग व्यक्तींना या प्रकल्पामध्ये लाभ देण्यात येणार असल्याचे प्रकल्प तंत्र सहाय्यक शेंडगे यांनी सांगितले.यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस. बी. ढगे, सरपंच विठ्ठल खैरे, बालासाहेब शिंदे, ग्रामविकास मंदोडे, अप्पासाहेब शेंडगे, प्रकल्प सहाय्यक मिलींद गवई, कैलास शेळके, मारोती मंगडे, अब्दूल रईस, लक्ष्मण रईस, लक्ष्मण काटे, शिवाजी डवणे, सत्यनारायण शिंदे, जगन जाधव यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र