शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सुरंगळीतील जांभूळांचा राज्यभर गोडवा; शेतकरी कुटुंबाने ३ एकरात घेतले ३० लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 18:35 IST

पुणे, अमरावती, जालना, औरंगाबादच्या बाजारपेठेत मागणी वाढली

- फकिरा देशमुखभोकरदन (जालना):  तालुक्यातील सुरंगळी येथील सपकाळ या शेतकरी कुटुंबाने जांभूळ बाग लागवडीचा प्रयोग यशस्वी करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. तीन एकरातील केवळ 150 झाडातून सपकाळ कुटूंबाला तब्बल 30 लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. या जांभळाचा गोडवा राज्यभर पसरला असून वाढती मागणी आहे. केवळ जाभळाच्या उत्पादनातून शेतकऱ्याची आर्थिक प्रगतीकडे वाटचाल पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे. 

भोकरदनपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या  सुरंगळी येथील कौतिकराव विठ्ठल सपकाळ  आणि त्यांच्या  भावंडांनी २००८ मध्ये बारामती येथील जांभळाची रोपे आणली. २० बाय ३० या अंतरावर तीन एकरांत त्यांची लागवड केली. त्यावेळी अनेकांनी या जांभूळ बागेवर प्रश्न उपस्थित केले. मात्र, सपकाळ कुटुंबाने विविध अडचणींवर मात करून बागेची जोपासना केली. बाग वाचविण्यासाठी पाणीटंचाई निर्माण झाल्याने सपकाळ कुटुंबाने  २०१६ मध्ये तीन किलोमीटर अंतरावरील जुई धरणात विहीर खोडून पाईपलाईनद्वारे शेतात पाणी आणले. बाग जगली मात्र जांभळातून उत्पादन कमी असल्याची सल्ले देत अनेकांनी सपकाळ कुटूंबाला वेड्यात काढले. 

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून या जांभूळ बागेने सपकाळ कुटूंबाचा कायापालट केला आहे. या बागेतून पंधरा ते विस दिवसांपासून उत्पादन सुरू झाले आहे. दररोज 10 क्विंटल जांभूळ अमरावती, पुणे, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणच्या बाजारपेठत विक्रीसाठी जात आहेत. हे जांभूळ चविष्ट व दर्जेदार असल्याने ग्राहकातून अल्पवधीत मागणी वाढली. त्यामुळे व्यापारी या जांभळाची खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. 

निव्वळ नफा २५ लाख मिळेल आत्तापर्यंत बागेची पाच वेळा हार्वेस्टिंग करण्यात आली असून 13 ते 14 लाखाचे उत्पादन हातात आले आहे. आणखी पंधरा ते पंचवीस दिवस या बागेतून उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे एकूण 30 ते 32 लाख रुपये उत्पादन या वर्षी मिळेल. त्यातून पाच लाख रुपये खर्च वजा केला सात निव्वळ नफा 25 लाख मिळेल. फवारणीपासून ते खताची मात्रा कोणती द्यावी याबाबत योगेश जाधव यांनी त्यांना मदत केली. त्यामुळे फळांचे वजन २५ ते ३० ग्रॅमपर्यंत आले आहे. - कौतीक विठ्ठल सपकाळ, प्रगतीशील शेतकरी

मजुरांना रोजगार मिळालासपकाळ यांच्या जांभुळ बागेमुळे सुरंगळी, कल्याणी परिसरातील 25 ते 30 मजुरांना एक महिनाभर जांभूळ तोडण्यासाठी काम मिळाले आहे. सपकाळ कुटुंबातील सदस्यांनी जांभूळ बागेतून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जांभूळापासून ज्युस, बियापासून पावडर तयार सुद्धा करता येते. त्याला सुद्धा चांगली मागणी आहे. - रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीagricultureशेती