शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

सुरंगळीतील जांभूळांचा राज्यभर गोडवा; शेतकरी कुटुंबाने ३ एकरात घेतले ३० लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 18:35 IST

पुणे, अमरावती, जालना, औरंगाबादच्या बाजारपेठेत मागणी वाढली

- फकिरा देशमुखभोकरदन (जालना):  तालुक्यातील सुरंगळी येथील सपकाळ या शेतकरी कुटुंबाने जांभूळ बाग लागवडीचा प्रयोग यशस्वी करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. तीन एकरातील केवळ 150 झाडातून सपकाळ कुटूंबाला तब्बल 30 लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. या जांभळाचा गोडवा राज्यभर पसरला असून वाढती मागणी आहे. केवळ जाभळाच्या उत्पादनातून शेतकऱ्याची आर्थिक प्रगतीकडे वाटचाल पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे. 

भोकरदनपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या  सुरंगळी येथील कौतिकराव विठ्ठल सपकाळ  आणि त्यांच्या  भावंडांनी २००८ मध्ये बारामती येथील जांभळाची रोपे आणली. २० बाय ३० या अंतरावर तीन एकरांत त्यांची लागवड केली. त्यावेळी अनेकांनी या जांभूळ बागेवर प्रश्न उपस्थित केले. मात्र, सपकाळ कुटुंबाने विविध अडचणींवर मात करून बागेची जोपासना केली. बाग वाचविण्यासाठी पाणीटंचाई निर्माण झाल्याने सपकाळ कुटुंबाने  २०१६ मध्ये तीन किलोमीटर अंतरावरील जुई धरणात विहीर खोडून पाईपलाईनद्वारे शेतात पाणी आणले. बाग जगली मात्र जांभळातून उत्पादन कमी असल्याची सल्ले देत अनेकांनी सपकाळ कुटूंबाला वेड्यात काढले. 

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून या जांभूळ बागेने सपकाळ कुटूंबाचा कायापालट केला आहे. या बागेतून पंधरा ते विस दिवसांपासून उत्पादन सुरू झाले आहे. दररोज 10 क्विंटल जांभूळ अमरावती, पुणे, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणच्या बाजारपेठत विक्रीसाठी जात आहेत. हे जांभूळ चविष्ट व दर्जेदार असल्याने ग्राहकातून अल्पवधीत मागणी वाढली. त्यामुळे व्यापारी या जांभळाची खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. 

निव्वळ नफा २५ लाख मिळेल आत्तापर्यंत बागेची पाच वेळा हार्वेस्टिंग करण्यात आली असून 13 ते 14 लाखाचे उत्पादन हातात आले आहे. आणखी पंधरा ते पंचवीस दिवस या बागेतून उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे एकूण 30 ते 32 लाख रुपये उत्पादन या वर्षी मिळेल. त्यातून पाच लाख रुपये खर्च वजा केला सात निव्वळ नफा 25 लाख मिळेल. फवारणीपासून ते खताची मात्रा कोणती द्यावी याबाबत योगेश जाधव यांनी त्यांना मदत केली. त्यामुळे फळांचे वजन २५ ते ३० ग्रॅमपर्यंत आले आहे. - कौतीक विठ्ठल सपकाळ, प्रगतीशील शेतकरी

मजुरांना रोजगार मिळालासपकाळ यांच्या जांभुळ बागेमुळे सुरंगळी, कल्याणी परिसरातील 25 ते 30 मजुरांना एक महिनाभर जांभूळ तोडण्यासाठी काम मिळाले आहे. सपकाळ कुटुंबातील सदस्यांनी जांभूळ बागेतून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जांभूळापासून ज्युस, बियापासून पावडर तयार सुद्धा करता येते. त्याला सुद्धा चांगली मागणी आहे. - रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीagricultureशेती