शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या पाचही पोलिसांचे निलंबन मागे; गृहमंत्र्यांनी दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 11:10 IST

कुठलेच कायदेशीर आदेश नसताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयात पोलिसांनी झडती घेतली होती.

जालना : कुठलेच कायदेशीर आदेश नसताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयात पोलिसांनी झडती घेतली होती. या प्रकरणी दोन पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केल्यानं संबंधित पोलीस स्थानकात खळबळ उडाली होती. मात्र आता पाचही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलेल्या निवेदनानंतर गृहमंत्र्यांनी निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. या वेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे हेसुद्धा त्यांच्यासोबत होते. अर्जुन खोतकर यांचे गृहमंत्र्यांनी सर्व प्रकरण ऐकून घेतले. यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची कोणतीच चूक नव्हती. अशा प्रकारे जर पोलिसांवर जर चुकीची कारवाई होत असेल तर पोलिसांनी काम कसे करावे, असा सवाल खोतकर यांनी वळसे पाटील यांना केला. त्यानंतर वळसे पाटील यांनी हे निलंबन मागे घेण्यात येईल, असा शब्द दिला होता. त्यानंतर आज संबंधित पाचही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. 

११ जून रोजी जाफराबाद येथे केंद्रीय राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. तेथे जाऊन जाफराबाद येथील पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, युवराज सुभाष पोठरे हे दोन पोलीस उपनिरीक्षक आणि जमादार मंगलसिंग रायसिंग सोळंके, सचिन उत्तमराव तिडके आणि महिला पोलीस कर्मचारी शबाना जलाल तडवी यांनी कायदेशीर आदेश नसताना झाडाझडती घेतली. याप्रकरणी दानवे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. चौकशी अंती पाचही पोलीस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सोमवारी निलंबित केले. या निर्णयाने संपूर्ण पोलीस दल हादरले आहे.

काय आहे प्रकरण?

कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी ११ जूनला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदा झाडाझडती घेतली. अशाच प्रकारे पोलिस खात्यात जनमानसात प्रतिमा मलिन होण्यास कारणीभूत होऊन कर्तव्यात बेकायदा व बेशिस्तीचे वर्तन केले, असा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशीअंती २ पोलिस उपनिरीक्षक व ३ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. याबाबत दानवे यांनी यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसंच कामकाजाच्या संचिका देखील सोबत नेल्या अशी लेखी तक्रार केली होती.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेPoliceपोलिसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलJalanaजालना