शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

ठिबकवरच उसाची लागवड करावी -देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:01 IST

मराठवाड्यात उसासाठी लागणारे मुबलक पाणी नसल्याने, भविष्यात शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना ठिबक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाड्यात उसासाठी लागणारे मुबलक पाणी नसल्याने, भविष्यात शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना ठिबक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ठिबकचे अनुदान आम्ही ८० टक्क्यांवर नेल्याचेही ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात राज्याचे संपूर्ण प्रश्न सुटलेत असे मी म्हणणार नाही; परंतु आघाडी सरकारच्या तुलनेत आमची विकासाची गती ही निश्चितच चांगली असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस हे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाचवर्षात केलेल्या विविध कल्याणकारी योजना कशा प्रभावीपणे राबविल्या, याची माहिती दिली. शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी रूपये वाटप केले असून, मुद्रा योजना, जनधन योजनेतही महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचा दावा त्यांनी केला. मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाड्याच्या वाट्याचे १०२ टीमएसी पाणी आम्ही कुठेही वाया जाऊ न देता त्याचे सुक्ष्म नियोजन करण्यासाठी जलआराखडा तयार केल्याचे ते म्हणाले. या आराखड्यास मान्यता घेतल्याचे ते म्हणाले. वॉटरग्रीड योजनेचाही त्यांनी येथे उल्लेख केला. समुद्रात वाहून जाणारे पाणीही मराठवाड्यात वळवण्याचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतल्याचे ते म्हणाले.आगामी निवडणुका या शिवसेने सोबत युतीने लढणार काय? यावर त्यांनी आम्ही संकटात एमेकांना साथ दिली, आता तर सत्ता आमचीच असल्याने युतीनेच निवडणूक होईल असे सांगून आम्ही विक्रमी मताधिक्यांने बहुमत मिळवू असे त्यांनी स्पष्ट केले. शिवेसेनेच युवा नेते आदित्य ठाकरे हे सकारात्मक असून, त्यांचा उत्साह वाखण्या जोगा आहे. त्यांच्या आशीर्वाद यात्रेलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रांवर गर्दी नसल्याने त्या यात्रा अपयशी ठरत असल्याचे सांगितले. जलयुक्त शिवार योजना ही यशस्वी ठरल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे आदींची प्रमुख उपस्थिती होती.जालन्यातील खरपुडी परिसरात होऊ घातलेल्या सिडको प्रकल्पाची जमीन संपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, त्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क देखील भरले आहे. त्यामुळे आता हा सिडकोचा प्रकल्प जालन्यात येत्या काही महिन्यात मार्गी लागेल असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना नमूद केले. सिडको अन्यत्र हलविण्याचा कुठलाही विचार सध्या तरी नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जुन सांगितले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प