शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

ठिबकवरच उसाची लागवड करावी -देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:01 IST

मराठवाड्यात उसासाठी लागणारे मुबलक पाणी नसल्याने, भविष्यात शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना ठिबक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाड्यात उसासाठी लागणारे मुबलक पाणी नसल्याने, भविष्यात शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना ठिबक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ठिबकचे अनुदान आम्ही ८० टक्क्यांवर नेल्याचेही ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात राज्याचे संपूर्ण प्रश्न सुटलेत असे मी म्हणणार नाही; परंतु आघाडी सरकारच्या तुलनेत आमची विकासाची गती ही निश्चितच चांगली असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस हे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाचवर्षात केलेल्या विविध कल्याणकारी योजना कशा प्रभावीपणे राबविल्या, याची माहिती दिली. शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी रूपये वाटप केले असून, मुद्रा योजना, जनधन योजनेतही महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचा दावा त्यांनी केला. मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाड्याच्या वाट्याचे १०२ टीमएसी पाणी आम्ही कुठेही वाया जाऊ न देता त्याचे सुक्ष्म नियोजन करण्यासाठी जलआराखडा तयार केल्याचे ते म्हणाले. या आराखड्यास मान्यता घेतल्याचे ते म्हणाले. वॉटरग्रीड योजनेचाही त्यांनी येथे उल्लेख केला. समुद्रात वाहून जाणारे पाणीही मराठवाड्यात वळवण्याचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतल्याचे ते म्हणाले.आगामी निवडणुका या शिवसेने सोबत युतीने लढणार काय? यावर त्यांनी आम्ही संकटात एमेकांना साथ दिली, आता तर सत्ता आमचीच असल्याने युतीनेच निवडणूक होईल असे सांगून आम्ही विक्रमी मताधिक्यांने बहुमत मिळवू असे त्यांनी स्पष्ट केले. शिवेसेनेच युवा नेते आदित्य ठाकरे हे सकारात्मक असून, त्यांचा उत्साह वाखण्या जोगा आहे. त्यांच्या आशीर्वाद यात्रेलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रांवर गर्दी नसल्याने त्या यात्रा अपयशी ठरत असल्याचे सांगितले. जलयुक्त शिवार योजना ही यशस्वी ठरल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे आदींची प्रमुख उपस्थिती होती.जालन्यातील खरपुडी परिसरात होऊ घातलेल्या सिडको प्रकल्पाची जमीन संपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, त्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क देखील भरले आहे. त्यामुळे आता हा सिडकोचा प्रकल्प जालन्यात येत्या काही महिन्यात मार्गी लागेल असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना नमूद केले. सिडको अन्यत्र हलविण्याचा कुठलाही विचार सध्या तरी नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जुन सांगितले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प