शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठिबकवरच उसाची लागवड करावी -देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:01 IST

मराठवाड्यात उसासाठी लागणारे मुबलक पाणी नसल्याने, भविष्यात शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना ठिबक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाड्यात उसासाठी लागणारे मुबलक पाणी नसल्याने, भविष्यात शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना ठिबक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ठिबकचे अनुदान आम्ही ८० टक्क्यांवर नेल्याचेही ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात राज्याचे संपूर्ण प्रश्न सुटलेत असे मी म्हणणार नाही; परंतु आघाडी सरकारच्या तुलनेत आमची विकासाची गती ही निश्चितच चांगली असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस हे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाचवर्षात केलेल्या विविध कल्याणकारी योजना कशा प्रभावीपणे राबविल्या, याची माहिती दिली. शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी रूपये वाटप केले असून, मुद्रा योजना, जनधन योजनेतही महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचा दावा त्यांनी केला. मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाड्याच्या वाट्याचे १०२ टीमएसी पाणी आम्ही कुठेही वाया जाऊ न देता त्याचे सुक्ष्म नियोजन करण्यासाठी जलआराखडा तयार केल्याचे ते म्हणाले. या आराखड्यास मान्यता घेतल्याचे ते म्हणाले. वॉटरग्रीड योजनेचाही त्यांनी येथे उल्लेख केला. समुद्रात वाहून जाणारे पाणीही मराठवाड्यात वळवण्याचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतल्याचे ते म्हणाले.आगामी निवडणुका या शिवसेने सोबत युतीने लढणार काय? यावर त्यांनी आम्ही संकटात एमेकांना साथ दिली, आता तर सत्ता आमचीच असल्याने युतीनेच निवडणूक होईल असे सांगून आम्ही विक्रमी मताधिक्यांने बहुमत मिळवू असे त्यांनी स्पष्ट केले. शिवेसेनेच युवा नेते आदित्य ठाकरे हे सकारात्मक असून, त्यांचा उत्साह वाखण्या जोगा आहे. त्यांच्या आशीर्वाद यात्रेलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रांवर गर्दी नसल्याने त्या यात्रा अपयशी ठरत असल्याचे सांगितले. जलयुक्त शिवार योजना ही यशस्वी ठरल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे आदींची प्रमुख उपस्थिती होती.जालन्यातील खरपुडी परिसरात होऊ घातलेल्या सिडको प्रकल्पाची जमीन संपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, त्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क देखील भरले आहे. त्यामुळे आता हा सिडकोचा प्रकल्प जालन्यात येत्या काही महिन्यात मार्गी लागेल असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना नमूद केले. सिडको अन्यत्र हलविण्याचा कुठलाही विचार सध्या तरी नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जुन सांगितले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प