शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

विद्यार्थ्यांचा जुई प्रकल्पातून दोन किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:45 IST

मुख्य रस्ता जुई मध्यम प्रकल्पात गेल्याने आणि प्रकल्प भरलेला असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज होडीद्वारे दोन किलोमीटरचा प्रवास पाण्यातून करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील सुरंगळीवाडी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरंगळी गावात जावे लागते. मात्र, मुख्य रस्ता जुई मध्यम प्रकल्पात गेल्याने आणि प्रकल्प भरलेला असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज होडीद्वारे दोन किलोमीटरचा प्रवास पाण्यातून करावा लागत आहे. गत दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांची ही जीवघेणी कसरत सुरू असून, एखादी मोठी घटना घडल्यानंतर प्रशासन याकडे लक्ष देणार का, असाच संतप्त प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.जवळपास ५०० लोकवस्ती असलेल्या सुरंगळीवाडी गावात आठवीपर्यंत शाळा आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी येथील १० ते १५ विद्यार्थ्यांना सुरंगळी येथील काशी विश्वेश्वर विद्यालयात जावे लागते. सुरंगळी ते सुरंगळीवाडी या दरम्यान तीन किलोमीटर अंतर आहे. मात्र, जुई प्रकल्पाची निर्मिती झाली आणि रस्ता प्रकल्पात गेला. प्रकल्प भरला की, हा रस्ता पाण्याखाली जातो. सुरंगळवाडी गावात बस येत नाही. त्यामुळे प्रकल्पातील होडीचा आधार घेऊनच प्रवास करावा लागतो. दुसरा मार्ग दानापूर मार्गे जातो. मात्र, १५ किलोमीटर अंतर पार करून सुरंगळी गावात जावे लागते. त्यातही सुरंगळवाडी ते दानापूर हा दहा किलोमीटरचा रस्ता असून नसल्यासारखा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना होडीतून प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही !जुई प्रकल्पातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या होडीला चालविण्यासाठी प्रशिक्षित नावाडी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा ग्रामस्थांना होडी चालवावी लागते. कधी दोरी व्यवस्थित बांधलेली नसते तर कधी होडी जलपर्णीत अडकते. अशा एक ना अनेक समस्यांवर मात करीत आठवीच्या पुढील शिक्षण घेण्यासाठी येथील १० ते १२ विद्यार्थ्यांना २० ते ३० फूट पाणी असलेल्या जुई प्रकल्पातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मागील दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा प्रवास सुरू आहे.ग्रामस्थांच्या मागणीकडे कोणीही लक्ष देईनाया प्रकल्पातून मोठा पूल तयार करावा किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी गत अनेक वर्षापासून ग्रामस्थ करीत आहेत. मात्र, प्रशासन या मागणीला गांभीर्याने घेत नाही. १० ते १२ विद्यार्थी दररोज जीवघेणा प्रवास करतात. ग्रामस्थांचे हेच हाल त्यातच एखाद्या रूग्णाला दवाखान्यात न्यायचे म्हटले तर अडचणींचा डोंगर सर करावा लागतो. सुरंगळीवाडी गावातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची होणारी जीवघेणी कसरत पाहता प्रशासनाला जाग येणार तरी कधी, हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकStudentविद्यार्थीEducationशिक्षणroad safetyरस्ते सुरक्षा