शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरुग्णांना निक्षय पोषण योजनेचा आधार; मराठवाड्यात सर्वाधिक लाभार्थी जालन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 13:46 IST

केंद्र सरकारने आॅक्टोबर २०१७ पासून क्षयरोगावरील औषध उपचार घेणाऱ्या रूग्णांकरिता निक्षय पोषण योजना सुरू केली आहे.

ठळक मुद्देप्रति महिना लाभार्थ्याला मिळतात ५०० रूपयेरक्कम सदरील रूग्णाच्या बँक खात्यावर जमा केली जाते. 

- विकास व्होरकटे

जालना : क्षयरोग झालेल्या रूग्णांना सकस आहार मिळावा, यासाठी केंद्र शासनाने निक्षय पोषण योजना सुरू केली आहे. यात १ जानेवारी ते ३ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधित मराठवाड्यात सर्वाधिक लाभ जालन्यातील १ हजार १३६ क्षयरोग ग्रस्तांना मिळाला आहे. 

राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने आॅक्टोबर २०१७ पासून क्षयरोगावरील औषध उपचार घेणाऱ्या रूग्णांकरिता निक्षय पोषण योजना सुरू केली आहे. रूग्णांना सकस आहार मिळावा, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेंतर्गत शासकीय किंवा खाजगी रूग्णालयांमध्ये क्षयरोगावर औषधोपचार घेणाऱ्या रूग्णास प्रति महिना ५०० रूपये पोषण आहार भत्ता दिला जातो. याची रक्कम सदरील रूग्णाच्या बँक खात्यावर जमा केली जाते. 

१ जानेवारी ते ३ सप्टेंबर या आठ महिने तीन दिवसांच्या कालावधीदरम्यान परभणी जिल्ह्यात १ हजार ३७८ क्षय रोगग्रस्त उपचार घेणारे आढळून आले आहेत. यातील ५६१ (५७ टक्के) जणांना निक्षय पोषण योजनेचा लाभ मिळाला आहे. औरंगाबादेत ९२५ रूणांपैकी ३७८ (४८ टक्के), बीड १ हजार रूग्णांपैकी ७५७ (६२ टक्के), उस्मानाबाद ८११ पैकी ६८८ (७२ टक्के), नांदेड १ हजार ३०० जणांपैकी १०५९ (७३ टक्के), हिंगोली ५६४ पैकी ४२४ (६८ टक्के), लातूर १२७० पैकी ९६८ (६४ टक्के) तर जालना जिल्ह्यात १२०२ पैकी १ हजार १३६ लाभार्थ्यांना (८३ टक्के) निक्षय पोषण योजनेचा लाभ मिळाला आहे. यात २१ लाख ४९ हजार रूपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. 

असा होतो उपचार क्षयरोग ग्रस्त रूग्णावर दोन टप्प्यात औषधोपचार केले जातात. पहिल्या टप्प्यातील सहा महिन्यादरम्यानच्या कालावधित रूग्णाला औषध उपचार करूनही फरक न पडल्यास त्याला एमडीआरटीबी म्हणून घोषित केले जाते. यात १२ ते २४ महिन्याच्या कालावधीत उपचार केले जातात. यात लाभार्थ्याला प्रति महिना ५०० रूपये दिले जातात. 

... तर यांना बक्षिस जिल्ह्यातील क्षयरोग रूग्णांची माहिती तातडीने जिल्हा प्रशासनाला मिळावी, जेणेकरून रूग्णांवर उपचार करणे सुलभ होईल, यासाठी शासनाच्या वतीने बक्षिस स्वरूपात एक योजना राबविली जाते. यात आशा, स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या व सामाजिक कार्यकर्ता यांनी क्षयरोग ग्रस्त रूग्णाची जिल्हा कार्यालयास माहिती दिल्यास त्यांना प्रति रूग्ण ५०० रूपयांचे बक्षिस दिले जाते.

क्षयरोगाचा आलेख वाढताच जालना जिल्ह्यात मागील तीन वर्षांचा क्षयरोग ग्रस्तांचा आढाव घेतल्यास यात दरवर्षी रूग्णांची वाढ झालेली दिसून येत आहे. २०१७ मध्ये जिल्ह्यात ३२३ क्षयरोगाचे रूग्ण उपचार घेणारे आढळून आले होते. २०१८ मध्ये २०७३ तर २०१९ मध्ये तब्बल २७१८ क्षयरोगाचे रूग्ण आढळून आले आहेत. 

रुग्णांनी बँक खात्याची माहिती द्यावी खाजगी किंवा शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या  क्षयरूग्णांनी तातडीने त्यांचा बँक खात्यांची माहिती आयएफएससी कोडसह  जमा करावी. जेणेकरून रूग्णांना निक्षय पोषण योजनेचा वेळेवर लाभ मिळेल.- डॉ. ए. बी. जगताप, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जालना

टॅग्स :MarathwadaमराठवाडाHealthआरोग्यJalanaजालना