शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मतदार दिनातून लोकशाही बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:54 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारत हा लोकशाही प्रधान देश असून, या देशात निवडणुकांच्या माध्यमातून आपण लोकशाही अधिक बळकट करतो. तरुणांमध्ये लोकशाहीचे बिजारोपण करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस महत्वाची भूमिका बजावतो, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंजली कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी बसैय्ये, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, गटशिक्षणधिकारी विठ्ठल जायभाये, पोलीस निरीक्षक निशिकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी देवडे यांची उपस्थिती होती.परळीकर म्हणाले, शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक शालेय वयात केल्यास निश्चितच आगामी काळात लोकशाही अधिक बळकट होईल व यातून मतदानाची टक्केवारी वाढेल. यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, डाटा एंट्री आॅपरेटर, निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धेत बक्षिस प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा देण्यात आली.प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंजली कानडे यांनी गांधी चमन येथून हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, विद्यार्थिंनी, पोलीस बँड पथक, एस.आर.पी.एफ.चे जवान आदींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :democracyलोकशाहीVotingमतदानSocialसामाजिक