शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

जालन्यात संतप्त नागरिकांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:05 IST

पैसे मोजूनही पाणी मिळत नसल्याने शहरातील कन्हैयानगर परिसरातील नागरिकांनी दुपारी चार वाजता कन्हैयानगर चौफुली येथे तासभर रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली.

ठळक मुद्देआंदोलक आक्रमक : टँकरने पाणीपुरवठा करावा, काहीकाळ वाहतूक ठप्प

जालना : शहराचा पाणी पुरवठा वीस दिवसापासून विस्कळीत झाला आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय सुरु आहे. पैसे मोजूनही पाणी मिळत नसल्याने शहरातील कन्हैयानगर परिसरातील नागरिकांनी दुपारी चार वाजता कन्हैयानगर चौफुली येथे तासभर रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली. यावेळी परिसरात वाहनांच्या रांगाच - रांगा लागल्या होत्या.वीस-वीस दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने जालनेकर नागरिक वैतागले आहेत. मात्र, ही पाणी टंचाई निर्माण होण्यामागे पैठण ते अंबड मार्गावरील पाणी चोर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याचे काम येथील स्थानिक स्वराज्य संस्थेचे असते. असे असतांना पालिका प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोपही यावेळी संतप्त नागरिकांनी केला. शहरात येणाऱ्या पाण्याची चोरी होत असल्याने शहरात वीस दिवसापासून पाणी येत नसल्याचे सांगितल्या जाते. मात्र, कन्हैयानगर येथे गेल्या दोन महिन्यापासून नागरिक पाण्याविना हैराण आहे.शहराच्या पाणी वाटपावरुन राजकारण करण्यात येत आहे. यात सर्वसामान्य जनता होरपळून जात असल्याचा आरोप येथील नगरसेवक राहुल इंगोले यांनी केला.झोपडपट्टी परिसर असल्याने विकतचे पाणी घेण्याची परिस्थिती येथील नागरिकांची नाही. सर्वजण मोल- मजूरी करुन पोटभरणारे आहेत. निवडणुकीच्या वेळी मत मागायला येणारे कोठे लपून बसले असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी केला. वाहनांची वर्दळ असलेल्या कैन्हैयानगर येथील चौफुलीवर तासभर आंदोलन करण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.आश्वासनानंतर आंदोलन मागेनगरपालिकाचे पाणी पुरवठा सभापती रमेश गोरंक्षक, आणि पाणी पुरवठा विभागाचे अभियंता घुगे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. शनिवारी संध्याकाळपर्यत कन्हैयानगर परिसरात पाणी सोडण्याचे आश्वासन सभापती, अभियंत्याने दिल्याने तासाभºयानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी चंदनझिरा पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन