शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

जालन्यात संतप्त नागरिकांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:05 IST

पैसे मोजूनही पाणी मिळत नसल्याने शहरातील कन्हैयानगर परिसरातील नागरिकांनी दुपारी चार वाजता कन्हैयानगर चौफुली येथे तासभर रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली.

ठळक मुद्देआंदोलक आक्रमक : टँकरने पाणीपुरवठा करावा, काहीकाळ वाहतूक ठप्प

जालना : शहराचा पाणी पुरवठा वीस दिवसापासून विस्कळीत झाला आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय सुरु आहे. पैसे मोजूनही पाणी मिळत नसल्याने शहरातील कन्हैयानगर परिसरातील नागरिकांनी दुपारी चार वाजता कन्हैयानगर चौफुली येथे तासभर रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली. यावेळी परिसरात वाहनांच्या रांगाच - रांगा लागल्या होत्या.वीस-वीस दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने जालनेकर नागरिक वैतागले आहेत. मात्र, ही पाणी टंचाई निर्माण होण्यामागे पैठण ते अंबड मार्गावरील पाणी चोर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याचे काम येथील स्थानिक स्वराज्य संस्थेचे असते. असे असतांना पालिका प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोपही यावेळी संतप्त नागरिकांनी केला. शहरात येणाऱ्या पाण्याची चोरी होत असल्याने शहरात वीस दिवसापासून पाणी येत नसल्याचे सांगितल्या जाते. मात्र, कन्हैयानगर येथे गेल्या दोन महिन्यापासून नागरिक पाण्याविना हैराण आहे.शहराच्या पाणी वाटपावरुन राजकारण करण्यात येत आहे. यात सर्वसामान्य जनता होरपळून जात असल्याचा आरोप येथील नगरसेवक राहुल इंगोले यांनी केला.झोपडपट्टी परिसर असल्याने विकतचे पाणी घेण्याची परिस्थिती येथील नागरिकांची नाही. सर्वजण मोल- मजूरी करुन पोटभरणारे आहेत. निवडणुकीच्या वेळी मत मागायला येणारे कोठे लपून बसले असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी केला. वाहनांची वर्दळ असलेल्या कैन्हैयानगर येथील चौफुलीवर तासभर आंदोलन करण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.आश्वासनानंतर आंदोलन मागेनगरपालिकाचे पाणी पुरवठा सभापती रमेश गोरंक्षक, आणि पाणी पुरवठा विभागाचे अभियंता घुगे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. शनिवारी संध्याकाळपर्यत कन्हैयानगर परिसरात पाणी सोडण्याचे आश्वासन सभापती, अभियंत्याने दिल्याने तासाभºयानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी चंदनझिरा पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन