शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईवरून गाजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:43 IST

टँकरच्या फे-यातील हेराफेरी बाबत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत याबाबत विरोधी सदस्यांनी जाब विचारला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळामुळे तीव्र पाणी टंचाई आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात सहाशे टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पुरेशा प्रमाणात टँकरच्या फेऱ्याच होत नसल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहे. टँकरच्या फे-यातील हेराफेरी बाबत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत याबाबत विरोधी सदस्यांनी जाब विचारला.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी दुपारी तीन वाजता स्थायी समितीची बैठकीला सुरुवात झाली. यावेळी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतिश टोपे, कृषी सभापती जिाजाबाई कळंबे, सभापती रघुनाथ तौर, सदस्य बप्पासाहेब गोल्डे, जयमंगल जाधव उपस्थित होते.जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे तीन महिन्यापूर्वीच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच प्रशासनाने लोकसभा निवडणुकीचे कारण पुढे करत दुष्काळाबाबत गांभिर्याने लक्ष दिले नाही. त्यानंतर सुध्दा प्रशासनाने २०११ च्या जनगणेनेनुसार जिल्ह्यात ६०० टँकर मंजूर केले. मात्र सध्या २०१९ सुरु आहे. वाढलेल्या लोकसंख्येचा विचार न करताच टँकर सुरु केल्याने सदस्यांनी संताप व्यक्त करत सत्ताधाºयांना जाब विचारला. आधीच टँकरची संख्या कमी आहे. त्यातच पुरेशा प्रमाणात टँकरच्या फे-या होत नसल्याने नागरिकांना पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. याकडे जि.प. पाणीपुरवठा विभाग आणि गटविकास अधिका-यांचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठाकडूनही याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कोठे तरी पाणी पुरत असल्याची खंत जिल्हा परिषद सदस्यांची व्यक्त केली. सदस्यांनी केलेल्या आरोपाविषयी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतिश टोपे यांनी संबंधीत विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांची कानउघाडनी केली. या स्थायी सभेमध्ये जालना जिल्हा परिषदेचा विविध विभागांचा जवळपास ३६ कोटी रुपयांचा निधी परत गेल्याच्या मुद्यावरूनही विषय चांगलाच चर्चिला गेला. परंतु यात जि.प.चा दोष नसल्याचे अध्यक्ष खोतकर यांनी सांगितले.चौकशी समित्यांचा फार्सजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा आदी विभागात झालेल्या विविध विकास कामामध्ये अनियमितता अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध सहा समित्या चौकशीसाठी गठीत करण्यात आल्या होत्या.या समितील सदस्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी दोषी आढळले आहेत. मात्र अद्यापही सभागृहाने संबंधितांविरुध्द कारवाई केली नसल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला.पीकविमा देण्याचा ठरावजे पीक आपल्या परिसरात कमी प्रमाणात येते. त्या पिकाला विमा कंपनी भरघोस विमा देते. इतर पिकांना पुरेशा विमा मिळत नसल्याने शेतकºयांचे नुकसान होते. यामुळे सर्वच पिकांना जास्तीचा पीकविमा देण्याचा ठराव सभागृहात घेण्यात आला.अधिकाºयांचे दुर्लक्ष : मनरेगाच्या कामाविषयी अध्यक्षांचा संतापजिल्ह्यात प्रचंड दुष्काळ असतांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात मजुरांना प्रशासनाकडून पुरेशा प्रमाणात कामेच उपलब्ध करुन दिली नाही. परिणामी कामाविना मजूरांचे हाल होत असल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.मनरेगाची कामेच न झाल्याने राज्यात जिल्हा पाठीमागे आल्याने जिल्ह्याचे नुकसान झाल्याचे खोतकर यांनी बैठकीत खंत व्यक्त केली.कामात हलगर्जीपणा केलेल्या अधिकारी, कर्मचाºयांची चौकशी करण्यासाठी एक समितीची गठीत करण्यातआली आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ