शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

जायकवाडीतून पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:56 IST

जायकवाडीच्या डाव्या काळव्यातून अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी प्रकल्पात तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी दुपारी दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदी / सुखापुरी : जायकवाडीच्या डाव्या काळव्यातून अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी प्रकल्पात तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी जालना वडीगोद्री राज्य महामार्गावरील शहापूर येथे गल्हाटी संघर्ष समिती व शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी दुपारी दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यंदा बारसवाडा परिसरात अल्प प्रमणात पाऊस पडला आहे. यामुळे हा प्रकल्प मार्च महिन्यातच कोरडाठाक पडला असून येथे पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या प्रकल्पावर पाणी असल्यास पंचक्रोशीतील ५० ते ६० हजार नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.तसेच या परिसरात मोठ्या प्रमणात फळबागा आहेत. परंतु, पाण्याअभावी त्या संकटात सापडल्या आहेत. विहिरी व बोअरने तळ गाठला आहे. यामुळे या प्रकल्पात पाणी सोडल्यास याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.या पूर्वीही संघर्ष समितीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जायकवाडी अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभाग औरंगाबाद यांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत. परंतु, त्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याने याचा कोणाताही फायदा झाला नाही. असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू सुरू असल्याने मंडळ अधिकारी दिवाकर जोग्लादेवीकर यांना निवेदन देऊन नागरिकांनी आंदोलन मागे घेतले आहे. यापुढे तातडीने प्रकल्पात पाणी सोडले नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असेही मंडळाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष बंडू माईंद, शेतकरी संघटनेचे नेते सुरेश काळे, पं. स. सदस्य राईज बागवान, शहापूरचे सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती.मंगरूळ बंधाºयात पाणी सोडण्यासाठी दोन ठिकाणी उपोषणतीर्थपुरी : जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून मंगरूळ बंधाºयात तात्काळ पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी सकाळपासून बानेगाव येथील गोदावरी पात्रात, पंचायत समिती सदस्य शीतल उढाण व ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे.तसेच याच मागणीसाठी सीआर. ८७ कोळतेवाडी परिसरात सर्वपक्षीय शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. मंगरूळ बंधा-यात जायकवाडीच्या डाव्या किंवा उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी दोन्ही ठिकाणी बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.कोळतेवाडी येथे उपोषणाला बसलेल्यांमध्ये रामसगाव, शेवता, जोगलादेवी, लिंगसेवाडी, सौंदलगाव, विठ्ठलनगर, भोगगाव, राहेरी, बोरगाव, बाणेगाव गंगा आदी गावांमधील नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :agitationआंदोलनwater shortageपाणीटंचाईJayakwadi Damजायकवाडी धरण