शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीतून पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:56 IST

जायकवाडीच्या डाव्या काळव्यातून अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी प्रकल्पात तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी दुपारी दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदी / सुखापुरी : जायकवाडीच्या डाव्या काळव्यातून अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी प्रकल्पात तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी जालना वडीगोद्री राज्य महामार्गावरील शहापूर येथे गल्हाटी संघर्ष समिती व शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी दुपारी दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यंदा बारसवाडा परिसरात अल्प प्रमणात पाऊस पडला आहे. यामुळे हा प्रकल्प मार्च महिन्यातच कोरडाठाक पडला असून येथे पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या प्रकल्पावर पाणी असल्यास पंचक्रोशीतील ५० ते ६० हजार नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.तसेच या परिसरात मोठ्या प्रमणात फळबागा आहेत. परंतु, पाण्याअभावी त्या संकटात सापडल्या आहेत. विहिरी व बोअरने तळ गाठला आहे. यामुळे या प्रकल्पात पाणी सोडल्यास याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.या पूर्वीही संघर्ष समितीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जायकवाडी अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभाग औरंगाबाद यांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत. परंतु, त्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याने याचा कोणाताही फायदा झाला नाही. असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू सुरू असल्याने मंडळ अधिकारी दिवाकर जोग्लादेवीकर यांना निवेदन देऊन नागरिकांनी आंदोलन मागे घेतले आहे. यापुढे तातडीने प्रकल्पात पाणी सोडले नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असेही मंडळाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष बंडू माईंद, शेतकरी संघटनेचे नेते सुरेश काळे, पं. स. सदस्य राईज बागवान, शहापूरचे सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती.मंगरूळ बंधाºयात पाणी सोडण्यासाठी दोन ठिकाणी उपोषणतीर्थपुरी : जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून मंगरूळ बंधाºयात तात्काळ पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी सकाळपासून बानेगाव येथील गोदावरी पात्रात, पंचायत समिती सदस्य शीतल उढाण व ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे.तसेच याच मागणीसाठी सीआर. ८७ कोळतेवाडी परिसरात सर्वपक्षीय शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. मंगरूळ बंधा-यात जायकवाडीच्या डाव्या किंवा उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी दोन्ही ठिकाणी बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.कोळतेवाडी येथे उपोषणाला बसलेल्यांमध्ये रामसगाव, शेवता, जोगलादेवी, लिंगसेवाडी, सौंदलगाव, विठ्ठलनगर, भोगगाव, राहेरी, बोरगाव, बाणेगाव गंगा आदी गावांमधील नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :agitationआंदोलनwater shortageपाणीटंचाईJayakwadi Damजायकवाडी धरण