शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

राजुरात ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:50 IST

ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे स्वस्त धान्य दुकानातून खरेदी केलेल्या गव्हात रासायनिक खताचे मिश्रण आढळल्याचा प्रकार राजूर येथे समोर आला. या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले.समाजातील गोरगरीब घटकासाठी शासनाकडून स्वस्त धान्य योजना राबवण्यात येते. राजूर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ८९ मध्ये काही शिधापत्रिकाधारकांनी गहू खरेदी केला. खरेदी केलेल्या गव्हामध्ये रासायनिक खताचे मिश्रण असल्याचे आढळून आले आणि शिधापत्रिका धारकांत खळबळ उडाली. शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच गोरगरिबांना निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले होते.यावेळी तालुकाध्यक्ष बळीराम पुंगळे यांनी स्वस्त धान्य पुरवठादाराची चौकशी करावी, राजूर येथील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी केली. दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनात जि. प. सदस्य कैलास पुंगळे, बळीराम पुंगळे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.वैजीनाथ ढोरकुले, विष्णू सानप, जगन पवार, राजू पुंगळे, भरत पुंगळे, गजानन जुंबड, सुधाकर पिंपळे, भागाजी भाडळकर, माधवराव भालेराव, नाना पवार, तुळशीराम जुंबड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनAgriculture Sectorशेती क्षेत्रSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना