शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:46 IST

जिल्हाभरात तब्बल १ हजार ३२४ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे.

विकास व्होरकटे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरोग्य विभागातर्फे मागील तीन महिन्यात लहान बालकांचे वजन मोजण्यात आली असून, यात जिल्हाभरात तब्बल १ हजार ३२४ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. कुपोषित बालकांची ही आकडेवारी वाढण्यामागे महिला, बाल कल्याण विकास विभाग व जिल्हा रूग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रातील कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगत आहेत. पण, हा कुपोषित बालकांचा आकडा चिंताजनक असल्याचे दिसत आहे.० ते ६ वयोगटातील मुलांना योग्य तो आहार मिळावा. त्यांच्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी शासनातर्फे विविध योजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. असे असले तरीही जिल्ह्यात दिवसेंदिवस कुपोषित बालकांची आकडेवारी वाढत चालली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. आॅक्टोबर महिन्याचा त्रैमासिक अहवाल आरोग्य विभागातर्फे महिला, बाल कल्याण विकास विभागाला दिला आहे. यात त्यांनी आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोंबर या तीन महिन्यात जिल्हाभरात ० ते ६ वयोगटातील १ लाख ३३ हजार २९३ बालकांची वजन मोजली आहेत. यात त्यांना १ हजार ३२४ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले. दारिद्र्य कुटुंब स्थलांतरीत होणे यामुळे ही आकडेवारी असल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत.जिल्हा रुग्णालय : पोषण पुनर्वसन केंद्रजिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी शासनातर्फे सन २०१६ मध्ये जिल्हा रूग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे कुपोषित बालकांवर १४ दिवस उपचार केले जातात. यामध्ये बालकांना समतोल आहार, फळे, विविध डाळी, पालेभाज्या दिल्या जातात. यामुळे कुपोषित बालके येथे सुदृढ बालके होतात. या पोषण पुनर्वसन केंद्रात मागील वर्षी एप्रिल २०१७-१८ या कालावधीत १५५ बालकांवर उपचार करण्यात आले होते. यंदा एप्ा्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या काळावधित १०९ बालकांनी उपचार घेतले असून सध्या ७ जणांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यFamilyपरिवार