शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

समृध्दी महामार्गाच्या मार्किंगचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : मुंबई-नागपूर या समृध्दी महामार्गासाठी जालना जिल्ह्यात जवळपास जमिनीचे संपादन हे ८५ टक्के झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपूर या समृध्दी महामार्गासाठी जालना जिल्ह्यात जवळपास जमिनीचे संपादन हे ८५ टक्के झाले आहे. त्यासमुळे नाव्हा ते गेवराई या दरम्यानचे कंत्राट ज्या कंपनीला दिले आहे, त्यसा कंपनीने मार्किंग करण्यासह रस्ता सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या महामार्गाच्या लगत असलेल्या शेतजमिनित शेतळे तसेच शेजारी मॉल्स आणि कोल्डस्टोरेज उभारण्या येणार आहे. दरम्यान शेततळे उभारण्यासाठी शेतकरी उत्सुक नसल्याचे दिसून आले असून, या रस्त्यासाठी लागणारा मुरूम रस्त्या लगत असलेल्या शेतीतून घ्यावा लागणार आहे.समृध्दी महामार्गाच्या जमीन संपादनासह अन्य महत्वाच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, रस्ते विकास महांडळाचे उपविभागिय अधिकारी हनुमंत आरगुंडे, जालन्याचे उपविभागिय अधिकारी केशव नेटके, नायब तहसीलदार एल.डी. सोनुने, सोनवने, पी.के. ठाकूर आदींची यावेळी उपस्थिती होती. गेल्या काही महिन्यांमध्ये समृध्दीचे काम अंतिम टप्प्यात असून, जालना जिल्ह्यात जवळपास ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची जमीन संपादन केली असून, ज्याची टक्केवारी ८८ टक्के एवढी आहे. चारशे कोटी रूपयांपेक्षा अधिकचा मावेजा वाटप करण्यात आला आहे.इंटरचेंजचा मुद्दा सुटेनाजालना येथे होऊ घातलेल्या ड्रायपोर्टमुळे या महामार्गाला मोठे महत्त्व आले आहे. समृध्दी महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असून, यामुळे आयात-निर्यातीला चालना मिळणार आहे. त्यासाठी जालन्यात इंटरचेंज पॉइंट साठी जागा सोडण्यात आली आहे. परंतु हा इंटरचेंज खादगाव येथे होणार की, गुंडेवाडी शिवारात होणार, या बद्दल अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गroad transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरी