शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

समृध्दी महामार्गाच्या मार्किंगचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : मुंबई-नागपूर या समृध्दी महामार्गासाठी जालना जिल्ह्यात जवळपास जमिनीचे संपादन हे ८५ टक्के झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपूर या समृध्दी महामार्गासाठी जालना जिल्ह्यात जवळपास जमिनीचे संपादन हे ८५ टक्के झाले आहे. त्यासमुळे नाव्हा ते गेवराई या दरम्यानचे कंत्राट ज्या कंपनीला दिले आहे, त्यसा कंपनीने मार्किंग करण्यासह रस्ता सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या महामार्गाच्या लगत असलेल्या शेतजमिनित शेतळे तसेच शेजारी मॉल्स आणि कोल्डस्टोरेज उभारण्या येणार आहे. दरम्यान शेततळे उभारण्यासाठी शेतकरी उत्सुक नसल्याचे दिसून आले असून, या रस्त्यासाठी लागणारा मुरूम रस्त्या लगत असलेल्या शेतीतून घ्यावा लागणार आहे.समृध्दी महामार्गाच्या जमीन संपादनासह अन्य महत्वाच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, रस्ते विकास महांडळाचे उपविभागिय अधिकारी हनुमंत आरगुंडे, जालन्याचे उपविभागिय अधिकारी केशव नेटके, नायब तहसीलदार एल.डी. सोनुने, सोनवने, पी.के. ठाकूर आदींची यावेळी उपस्थिती होती. गेल्या काही महिन्यांमध्ये समृध्दीचे काम अंतिम टप्प्यात असून, जालना जिल्ह्यात जवळपास ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची जमीन संपादन केली असून, ज्याची टक्केवारी ८८ टक्के एवढी आहे. चारशे कोटी रूपयांपेक्षा अधिकचा मावेजा वाटप करण्यात आला आहे.इंटरचेंजचा मुद्दा सुटेनाजालना येथे होऊ घातलेल्या ड्रायपोर्टमुळे या महामार्गाला मोठे महत्त्व आले आहे. समृध्दी महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असून, यामुळे आयात-निर्यातीला चालना मिळणार आहे. त्यासाठी जालन्यात इंटरचेंज पॉइंट साठी जागा सोडण्यात आली आहे. परंतु हा इंटरचेंज खादगाव येथे होणार की, गुंडेवाडी शिवारात होणार, या बद्दल अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गroad transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरी