शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

पीकस्पर्धेत श्रीकांत आखाडे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

जयंतीनिमित्त अभिवादन जालना : येथील राष्ट्रीय एकात्मता सामाजिक मंचाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गांधीचमन येथे ...

जयंतीनिमित्त अभिवादन

जालना : येथील राष्ट्रीय एकात्मता सामाजिक मंचाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गांधीचमन येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ॲड. ब्रह्मानंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, किशोर जिगे, विजय बनकर, गोपी नाटेकर, विष्णू पाचफुले आदी उपस्थित होते.

सचिवपदी मोहन बाण यांची निवड

आष्टी : परतूर येथे शनिवारी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परतूर तालुक्यातील बाणाचीवाडी येथील मोहन बाण यांची राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष डाॅ. निसार देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती देऊन सत्कार करण्यात आला.

खालापुरे यांचा पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार

परतूर : येथील जिल्हा परिषद प्रशालेजवळील रहिवासी डिगांबर गणेश खालापुरे यांना आदिवासी विकास विभागात माध्यमिक शिक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. शासकीय आश्रमशाळा, तीसगाव (ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) या ठिकाणी त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. खालापुरे यांचा कपिल आकात, बाबासाहेब तेलगड, संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण आदींनी सत्कार केला.

रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी

भोकरदन : जुने भोकरदन ते रामपूरपर्यंतचा शिव रस्ता मोकळा करून देण्यासाठी गणेश तळेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी भोकरदन तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात भोकरदन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. शिव रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी शेतीशाळेचे आयोजन

राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील रवाना येथे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी, पोकरा प्रकल्पाअंतर्गत हवामान आधारित तंत्रज्ञान शेती शाळा घेण्यात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी बीएफ अर्थात रुंद सरी वरंबा पद्धतीने करावे, असे आवाहन शेतीशाळा प्रशिक्षक हनुमान लोंढे यांनी केले.

नागरिकांची गैरसोय

परतूर : शहरांतर्गत विविध भागातील नाल्या तुंबल्या आहेत. थोडाही पाऊस झाला की, या नाल्यांमधील पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.

शिक्षक समितीचे निवेदन

जालना : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी शिक्षक संघर्ष संघटना व कृती समितीच्या वतीने पालकमंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष सचिन देशमुख, नंदकिशोर लेखणार, मोहन नेहरे, भारत सोनवणे, दीपक सुसर, प्रा. वासरे, कळंबे, नवले, काकडे, कैलास जाधव आदींची उपस्थिती होती.