शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘आॅन दी स्पॉट’ पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:05 IST

मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील टंचाई आढावा बैठक घेऊन अधिकारी, कर्मचा-यांची चांगलीच कानउघडणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने बळीराजा हैराण आहे. शेतमजूरांच्या हाताला कामे नाहीत, त्यातच पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केले आहे. असे असतानाही गाव पातळीवरील अधिकारी, कर्मचारी हे चलता है धोरण स्वीकारत असल्याने याची दखल घेत मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील टंचाई आढावा बैठक घेऊन अधिकारी, कर्मचा-यांची चांगलीच कानउघडणी केली.जालना जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ६१ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपासह रबी हंगामही शेतक-यांच्या हातातून गेल्याने यंदा पाणीटंचाईसह अन्नधान्याची टंचाईही जाणवणार आहे. त्यातच आता साधारणपणे जूनपर्यंत शेतीत कुठलेच काम नसल्याने मजुरांवर स्थलांतराची वेळ येत आहे. त्यामुळे मजुरांना त्यांच्या गावातच हाताला कामे उपलब्ध व्हावीत या हेतूनेमहाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त कामे हाती घेण्याची गरज आहे.जिल्ह्यात गोदावरी नदीचा किनारा सोडल्यास अन्य तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. भोकरदन, जाफराबाद, जालना, बदनापूर आणि मंठा तालुक्यांचा यात विशेष करून समावेश होतो.त्यामुळे या तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने जातीने लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी शेतकरी, शेतमजूरतसेच लोकप्रतिनिधींनी यापूर्वीच झालेल्या आढावा बैठकांमधून केली आहे.एक तलाठी निलंबितदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बिनवडे यांनी अंबड येथे अंबड आणि घनसावंगी तालुक्याची बैठक घेतली. यावेळी त्यांनी टंचाईचा आढावा घेतला. याच बैठकीत रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावाही घेण्यात आला. त्या ज्या ग्रामपंचायतींमध्ये एकही काम सुरू नाही अशा ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांना दिले. तसेच चाराटंचाई, पाणंद रस्ते, स्वच्छता अभियान आणि अन्य महत्वाच्या मुद्यावर जिल्हाधिका-यांनी माहिती जाणून घेतली. सजावर न राहणाºया तलाठ्यांच्या वारंवार येणा-या तक्रारीवरून एका तलाठ्यास निलंबित करण्याचा निर्णय बैठकीतच घेण्यात आला.तालुकानिहाय टंचाई बैठकादुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्हाधिकारी बिनवडे यांनी जिल्ह्यातील आठही तालुक्यांच्या संयुक्त बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवारी अंबड आणि घनसावंगी तालुक्याची बैठक पार पडली. बुधवारी परतूर आणि मंठा तर गुरूवारी जालना आणि बदनापूर तालुक्यांच्या बैठका होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात देखील आढावा बैठक घेणार आहेत.मठपिंपळगाव : अंबड तालुक्यातील आलमगाव येथे जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ अंतर्गत झालेल्या कंम्पार्टमेंन्ट बंडींग (जमिनीवर बांध टाकणे) कामाची पाहणी मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केली.यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी महेंकर, अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार किशोर देशमुख, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, मंडळ अधिकारी गाडेकर, कृषी सहायक कीर्तीकर, सरपंच अशोक भिसे, ग्रामसेवक एन.डी.खरात, तलाठी खेडेकर, देविदास शेळके, कौतुक पवार, रामेश्वर गोंटे, गोकुळ खरात, सुभाष शेळके, शिवाजी शेळके, रोजगार सेवक हनुमान भारती, कुंभारी उगले यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :droughtदुष्काळcollectorजिल्हाधिकारीwater shortageपाणीटंचाई