शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
5
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
6
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
7
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
8
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
9
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
10
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
11
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
12
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
13
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
14
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
15
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
16
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
17
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
18
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
19
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
20
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे

जालना जिल्ह्यात रबीची केवळ १४ टक्केच पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:20 IST

जिल्ह्यात सद्य:स्थितीत केवळ १४ टक्केच रबीची पेरणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम पूर्णत वाया गेला आहे. दुसरीकडे रबी हंगामासाठी जमिनीत ओल नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी लांबविली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत केवळ १४ टक्केच रबीची पेरणी झाली आहे.दुष्काळ जणू जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता पूर्वीची तीन वर्षे भीषण दुष्काळी स्थितीत गेली. यंदाही परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने तितकीच गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात रबीचे १ लाख ५२ हजार ६०० हेक्टर क्षेत्र आहे. पंैकी आजवर केवळ १४ टक्केच पेरणी झाली आहे. जालना तालुक्यात २१ हजार ४५५ हेक्टर रबीचे क्षेत्र आहे. त्यापैकी ४३ टक्के पेरा झाला आहे. तर बदनापूर तालुक्यात ६ टक्केच पेरणी झाली आहे. जाफराबाद तालुक्यात २७ टक्के पेरणी झाली आहे. तर भोकरदनमध्ये ६ टक्के पेरणी झाली आहे. अंबडमध्ये ० टक्के पेरणी झाली आहे. परतूरमध्ये २ टक्के, घनसावंगीमध्ये १३ आणि मंठा तालुक्यात २३ टक्के पेरणी झाली आहे.पीक निहाय पेरा पाहता आजवर सवार्धिक ज्वारीची १० हजार ४७२ हेक्टरवर पेरणी झाली. मका २९९ हेक्टरवर, गहू ३ हजार १०० हेक्टरवर, तर हरभºयांचा ६ हजार ९६४ हेक्टरवर पेरा झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहेत.व्यापारी हैराणपावसाअभावी खरिपातील पिके हातची गेली आहेत. अपुºया ओलीमुळे रबीची पेरणी रखडली आहे. त्यामुळे बाजारपेठेत खते, बी-बियाणे खरेदीसाठी असणारी शेतक-यांची लगबग यंदा दिसून येत नाही. अनेक व्यापाºयांनी खते बियाणे विक्रीसाठी ठेवली; परंतु शेतकरीच खरेदी करण्यासाठी येत नसल्याने व्यापारी हैराण झाले आहेत.चाराटंचाई भासणार ?पाऊस नसल्यामुळे ज्वारी, मका या पिकांची पेरणी कमी झाल्यामुळे येणाºया काळात तीव्र चारा टंचाई भासणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळ