शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोडकळीस आलेल्या ११८ संसारांमध्ये फुलले हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:10 IST

दारूचे व्यसन, मोबाईलचा अति वापर आणि संशयीवृत्तीमुळे विवाहित दाम्पत्याच्या संसारात कलह निर्माण होत असल्याचे येथील महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल तक्रारींवरून समोर आले आहे

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दारूचे व्यसन, मोबाईलचा अति वापर आणि संशयीवृत्तीमुळे विवाहित दाम्पत्याच्या संसारात कलह निर्माण होत असल्याचे येथील महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल तक्रारींवरून समोर आले आहे. चालू वर्षातील नऊ महिन्यात तब्बल ५४८ तक्रारी दाखल झाल्या असून, पैकी २०८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यात ११८ प्रकरणात यशस्वी तडजोड झाली आहे.पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना येथील महिला तक्रार निवारण केंद्र काम करीत आहे. दाम्पत्यांमध्ये दारू, संशयी वृत्ती, मोबाईलचा अती वापर, व्यसनाधीनता, हुंडा, सासरच्या मंडळींचा, सासूचा हस्तक्षेप आदी एक ना अनेक कारणांनी सतत भांडण, तक्रारी होतात. घरात न मिटणारी भांडणे थेट पोलीस ठाण्यापर्यंत जातात. मात्र, गुन्हा दाखल होण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन करण्यासाठी या तक्रारी महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल केल्या जातात. पती-पत्नीकडील नातेवाईक बोलावून त्यांना समज दिली जाते. शिवाय दाम्पत्यांचे म्हणणे ऐकूण घेत त्यांच्या तक्रारींचा निपटारा करून मोडकळीस आलेल्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी या केंद्रातील अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत.जालना येथील केंद्रात चालू वर्षात आजवर ५४८ प्रकरणे दाखल झाली होती. पैकी ११८ प्रकरणात यशस्वी तडजोड करून संसार पुन्हा सुरळीत करण्यासाठी मदत करण्यात आली आहे.८३ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली. ७ प्रकरणात कोर्ट समन्स देण्यात आले. अशी एकूण २०८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तर ३४० प्रकरणे प्रलंबीत असून, याची सुनावणी सुरू आहे. तर याच केंद्रात सन २०१७ मध्ये ५४५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ३४२ प्रकरणात तडजोड करण्यात आली असून, १७ प्रकरणात कोर्ट समन्स देण्यात आली आहे. १८६ प्रकरणे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. २०१८ मध्ये ६८० तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ४२६ प्रकरणात तडजोड करण्यात आली. १६ प्रकरणे कोर्टात वर्ग करण्यात आली असून, २३८ प्रकरणे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली होती. मोडकळीस आलेले संसार पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्राच्या तत्कालीन प्रमुख सपोनि यमपुरे यांच्यासह कार्यरत प्रमुख पोउपनि एस.बी.राठोड, पोकॉ एम.ए.गायकवाड, एन.ए.शेख, एस.बी.राठोड, जे.जी.पवार, पोकॉ एम.आर.शेख आदी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :FamilyपरिवारPoliceपोलिसDivorceघटस्फोट