शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

मोडकळीस आलेल्या ११८ संसारांमध्ये फुलले हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:10 IST

दारूचे व्यसन, मोबाईलचा अति वापर आणि संशयीवृत्तीमुळे विवाहित दाम्पत्याच्या संसारात कलह निर्माण होत असल्याचे येथील महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल तक्रारींवरून समोर आले आहे

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दारूचे व्यसन, मोबाईलचा अति वापर आणि संशयीवृत्तीमुळे विवाहित दाम्पत्याच्या संसारात कलह निर्माण होत असल्याचे येथील महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल तक्रारींवरून समोर आले आहे. चालू वर्षातील नऊ महिन्यात तब्बल ५४८ तक्रारी दाखल झाल्या असून, पैकी २०८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यात ११८ प्रकरणात यशस्वी तडजोड झाली आहे.पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना येथील महिला तक्रार निवारण केंद्र काम करीत आहे. दाम्पत्यांमध्ये दारू, संशयी वृत्ती, मोबाईलचा अती वापर, व्यसनाधीनता, हुंडा, सासरच्या मंडळींचा, सासूचा हस्तक्षेप आदी एक ना अनेक कारणांनी सतत भांडण, तक्रारी होतात. घरात न मिटणारी भांडणे थेट पोलीस ठाण्यापर्यंत जातात. मात्र, गुन्हा दाखल होण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन करण्यासाठी या तक्रारी महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल केल्या जातात. पती-पत्नीकडील नातेवाईक बोलावून त्यांना समज दिली जाते. शिवाय दाम्पत्यांचे म्हणणे ऐकूण घेत त्यांच्या तक्रारींचा निपटारा करून मोडकळीस आलेल्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी या केंद्रातील अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत.जालना येथील केंद्रात चालू वर्षात आजवर ५४८ प्रकरणे दाखल झाली होती. पैकी ११८ प्रकरणात यशस्वी तडजोड करून संसार पुन्हा सुरळीत करण्यासाठी मदत करण्यात आली आहे.८३ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली. ७ प्रकरणात कोर्ट समन्स देण्यात आले. अशी एकूण २०८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तर ३४० प्रकरणे प्रलंबीत असून, याची सुनावणी सुरू आहे. तर याच केंद्रात सन २०१७ मध्ये ५४५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ३४२ प्रकरणात तडजोड करण्यात आली असून, १७ प्रकरणात कोर्ट समन्स देण्यात आली आहे. १८६ प्रकरणे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. २०१८ मध्ये ६८० तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ४२६ प्रकरणात तडजोड करण्यात आली. १६ प्रकरणे कोर्टात वर्ग करण्यात आली असून, २३८ प्रकरणे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली होती. मोडकळीस आलेले संसार पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्राच्या तत्कालीन प्रमुख सपोनि यमपुरे यांच्यासह कार्यरत प्रमुख पोउपनि एस.बी.राठोड, पोकॉ एम.ए.गायकवाड, एन.ए.शेख, एस.बी.राठोड, जे.जी.पवार, पोकॉ एम.आर.शेख आदी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :FamilyपरिवारPoliceपोलिसDivorceघटस्फोट