शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

मोडकळीस आलेल्या ११८ संसारांमध्ये फुलले हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:10 IST

दारूचे व्यसन, मोबाईलचा अति वापर आणि संशयीवृत्तीमुळे विवाहित दाम्पत्याच्या संसारात कलह निर्माण होत असल्याचे येथील महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल तक्रारींवरून समोर आले आहे

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दारूचे व्यसन, मोबाईलचा अति वापर आणि संशयीवृत्तीमुळे विवाहित दाम्पत्याच्या संसारात कलह निर्माण होत असल्याचे येथील महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल तक्रारींवरून समोर आले आहे. चालू वर्षातील नऊ महिन्यात तब्बल ५४८ तक्रारी दाखल झाल्या असून, पैकी २०८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यात ११८ प्रकरणात यशस्वी तडजोड झाली आहे.पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना येथील महिला तक्रार निवारण केंद्र काम करीत आहे. दाम्पत्यांमध्ये दारू, संशयी वृत्ती, मोबाईलचा अती वापर, व्यसनाधीनता, हुंडा, सासरच्या मंडळींचा, सासूचा हस्तक्षेप आदी एक ना अनेक कारणांनी सतत भांडण, तक्रारी होतात. घरात न मिटणारी भांडणे थेट पोलीस ठाण्यापर्यंत जातात. मात्र, गुन्हा दाखल होण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन करण्यासाठी या तक्रारी महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल केल्या जातात. पती-पत्नीकडील नातेवाईक बोलावून त्यांना समज दिली जाते. शिवाय दाम्पत्यांचे म्हणणे ऐकूण घेत त्यांच्या तक्रारींचा निपटारा करून मोडकळीस आलेल्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी या केंद्रातील अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत.जालना येथील केंद्रात चालू वर्षात आजवर ५४८ प्रकरणे दाखल झाली होती. पैकी ११८ प्रकरणात यशस्वी तडजोड करून संसार पुन्हा सुरळीत करण्यासाठी मदत करण्यात आली आहे.८३ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली. ७ प्रकरणात कोर्ट समन्स देण्यात आले. अशी एकूण २०८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तर ३४० प्रकरणे प्रलंबीत असून, याची सुनावणी सुरू आहे. तर याच केंद्रात सन २०१७ मध्ये ५४५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ३४२ प्रकरणात तडजोड करण्यात आली असून, १७ प्रकरणात कोर्ट समन्स देण्यात आली आहे. १८६ प्रकरणे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. २०१८ मध्ये ६८० तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ४२६ प्रकरणात तडजोड करण्यात आली. १६ प्रकरणे कोर्टात वर्ग करण्यात आली असून, २३८ प्रकरणे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली होती. मोडकळीस आलेले संसार पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्राच्या तत्कालीन प्रमुख सपोनि यमपुरे यांच्यासह कार्यरत प्रमुख पोउपनि एस.बी.राठोड, पोकॉ एम.ए.गायकवाड, एन.ए.शेख, एस.बी.राठोड, जे.जी.पवार, पोकॉ एम.आर.शेख आदी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :FamilyपरिवारPoliceपोलिसDivorceघटस्फोट