शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शेकडो वृक्षांची कत्तल...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:02 IST

ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. लाकडाने भरलेली वाहने रस्त्याने जाताना पाहावयास मिळत आहेत. तरीही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे ही वाहने सर्रास पोलीस ठाण्यासमोरून जात आहेत. यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अनेकदा वनप्रेमी लाकडाने भरलेले वाहने दिसताच वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळवितात. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. घनसावंगी तालुक्यातून जायकवाडीचा डावा कालवा गेला असल्याने तालुक्यात मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षांची संख्या वाढली. परंतु, मागील चार महिन्यांपासून औरंगाबाद, पिंपळगाव व परतुर येथील काही व्यापारी सर्रासपणे दलालांमार्फत अनेक गावांमध्ये वृक्षतोड करित आहेत. तसेच नियमित १० ते २० ट्रॅक्टरद्वारे तोडलेल्या वृक्षांची वाहतुक करित आहेत. अनेकदा व्यापारी रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षाला आग लावतात. यानंतर मशिनच्या त्या वृक्षाची दोन तासात कत्तल केली जाते. तसेच पाचोड ते आष्टी राज्यमार्गाचे काम सुरू असल्यानेही लाखो वृक्षांची कत्तल केली जात आहे.घनसांवगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली, बोडखा, मांदळा, घोनसी, शिंदखेड, देवी देगाव, लिंबूनी या परिसरातील वनराई व्यापा-यांनी पुर्णपणे नष्ट केली आहे. एकीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाकडून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जाते. मात्र, येथे दिवसाढवळ््या वृक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :environmentवातावरणforestजंगलNatureनिसर्ग