शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जालना जिल्ह्यातील ६१७ जणांनी घेतली विषाची परीक्षा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:56 IST

विजय मुंडे । लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कौटुंबिक, सामाजिक , आर्थिक अशा एक ना अनेक कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांचे ...

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक अशा एक ना अनेक कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असल्याचे चित्र आहे. चालू वर्षात विषारी द्रव प्राशन केलेल्या तब्बल ६१७ जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. यात ३४९ पुरूष तर २६८ महिलांचा समावेश आहे. विषाची परीक्षा घेतलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला असून, इतरांना जिल्हा जिल्हा रूग्णालयात वेळेत औषधोपचार मिळाल्याने त्यांचे प्राण बचावले आहेत.दुष्काळ, नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले. हे प्रमाण रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता विविध कारणांनी सर्वसामान्य नागरिक, महिलांच्या होणाºया आत्महत्या आणि त्याचे वाढणारे प्रमाण चिंतनीय आहे. जालना जिल्ह्यातही हे प्रमाण वाढताना दिसत आहे.यात विषारी द्रव प्राषण करून आत्महत्या करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. चालू वर्षात आजवर विषारी द्रव प्राषण केलेल्या ३४९ पुरूषांसह २६८ महिलांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. यात जानेवारीत ४३ पुरूष, ४४ महिला, फेबु्रवारीत १९ पुरूष, १६ महिला, मार्चमध्ये २७ पुरूष, ३६ महिला, एप्रिलमध्ये ३१ पुरूष, २४ महिला, मे महिन्यात ३५ पुरूष ४ महिला, जूनमध्ये ३० पुरूष, २५ महिला, जुलैमध्ये ३९ पुरूष, ३५ महिला, आॅगस्टमध्ये ६१ पुरूष, ४९ महिला तर सप्टेंबर महिन्यात ६४ पुरूष आणि ३५ महिलांनी विष प्राशन केले होते. संबंधितांना प्रथमोपचारानंतर जालना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिल्हा रूग्णालयातील महिला, पुरूष वॉर्डमध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांनी वेळेवर केलेल्या औषधोपचारामुळे ६१७ पैकी ६१५ जणांचे प्राण बचावले आहेत. तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. विविध कारणांनी आत्महत्येचा प्रयत्न करणा-यांची वाढती संख्या रोखण्यासाठी सर्वच प्रशासकीय पातळीवरून गावा-गावात विशेष उपक्रम राबवून सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.तिस-यावेळी झाला मृत्यूविष प्राशन केल्यानंतर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. यातील एका महिलेने तीन वेळेस विष प्राशन केले होते. दोन वेळेस संबंधित महिलेचे प्राण बचावले. मात्र, तिस-यावेळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका वृध्द महिलेनेही विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याSocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी