शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जालन्यात सहा नवीन ऑक्सिजन प्लांट उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

जालन्यात आता ऑक्सिजनसह रेमडेसिविरची मागणी तुलनेने कमी झाली आहे. ऑक्सिजनची सुविधा असलेले जवळपास २०० पेक्षा अधिक बेड शिल्लक आहेत. ...

जालन्यात आता ऑक्सिजनसह रेमडेसिविरची मागणी तुलनेने कमी झाली आहे. ऑक्सिजनची सुविधा असलेले जवळपास २०० पेक्षा अधिक बेड शिल्लक आहेत. परंतु कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता सरकारने ऑक्सिजन निर्मितीला प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून जालन्यातील कोविड रुग्णालय परिसरात डीआरडीओ अर्थात भारतीय संरक्षण रिसर्च आणि विकास संस्थेकडून दोन टन ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट मंजूर केला असून, त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनची कितीही गरज पडली तर जालन्यात अडचण येणार नाही या दृष्टीने ही तयारी सुरू आहे.

जालन्याप्रमाणेच राजूर, अंबड, परतूर तसेच घनसावंगी येथेही शंभर किलो ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारण्यात येणार आहेत. त्यांचेही काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली गेली. सद्य:स्थितीत जालन्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये दोन मोठे लिक्विड ऑक्सिजन साठवणुकीचे प्लांट याआधीच निर्माण करण्यात आल्याने अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जालन्यात ऑक्सिजनचा प्रश्न कमी प्रमाणात निर्माण झाला होता.

रुग्णसंख्या घटत असल्याने दिलासा

कोरोनाच्या चाचण्या वाढवूनही कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण गेल्या आठवडाभरात तुलनेने कमी झाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तर कोराेना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ३०० पेक्षा कमी होती. त्यामुळे दिलासा मिळाला असून, आता मृत्युदरही कमी होत असल्याने नागरिकांमधील चिंता कमी झाली आहे. ही चिंता कमी झाली असली तरी तिसरी लाट येणार असल्याचे संकेत मिळत असल्याने यंत्रणा आतापासूनच कामाला लागली आहे.