शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा, रस्त्यात सापडलेले ४२ हजार रुपये शेतकऱ्याला घरी नेऊन दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 18:14 IST

मिरची विकून आलेले पैसे रस्त्यात पडले, शेतकऱ्याला माहितीही नव्हते

भोकरदन / धावडा : रस्त्यावर पडलेली शंभर रुपयांची नोट जर सापडली, तर ती नोट आपलीच आहे, असे म्हणत ते पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. चुकीने बँक खात्यावर जमा झालेली रक्कम काढून खर्च केल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र, मतलबी दुनियेत आजही प्रामाणिकपणा शिल्लक आहे, याचा प्रत्यय सातत्याने येत असतो. अशीच एक घटना शेलूद येथे घडली असून, नववीच्या विद्यार्थ्याला घरी जाताना रस्त्यावर सापडलेले ४२ हजार रुपये शेतकऱ्याला परत केले. याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

शेलूद येथील अजिनाथ अंकुश जाधव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सरस्वती विद्या मंदिर शाळेत ९ वी मध्ये शिक्षण घेत आहे. बुधवारी शाळा सुटल्यानंतर धावडा-पिंपळगाव रस्त्यावरून घरी जात असताना, त्याला रस्त्यावर पैसे पडलेले दिसून आले. या पैशासोबत मिरची विक्री केल्याचे एक बिलही होते. त्यावर शेलूद येथील मिरची उत्पादक शेतकरी सागर विठ्ठल गोमलाडू यांचे नाव होते. पैशासोबतच्या बिलावरून हे पैसे गावातील गोमलाडू यांचे असल्याचे त्याच्या लक्षात आले. ते पैसे त्याने गोलमाडू यांच्या घरी जाऊन परत केले. या प्रामाणिकपणाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र वाघ यांनी गुरुवारी त्याचा शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

गाेलमाडू यांनी २६ जुलै रोजी मिरची तोडणी करून पिंपळगाव येथे व्यापाऱ्यास ६ हजार रुपये क्विटल दराने ८.10 क्विंटल मिरची विक्री केली. त्यातून त्यांना ४८,६०० रुपये मिळाले. त्यापैकी ६ हजार ६०० रुपयांचे मिरचीवरील औषधी खरेदी केली, व ४२ हजार रुपये घेऊन घरी येत होते. घाईघाईत येताना रस्त्यात ते पैसे पडले. जिवाचे रान करून कमावलेले पैसे अजिनाथच्या प्रामाणिकपणामुळे पुन्हा परत मिळाले.

चांगले संस्कार बाजारात मिरची विकून घरी आलो, हातपाय धुऊन घरात जात असतानाच, अजिनाथ व काही मुले घरी आली. त्यांनी तुमचे पैसे आम्हांला सापडले आहे, हे घ्या..असे म्हटल्यावर आधी मला काहीच कळाले नाही., कारण पैसे हरवल्याचे मला माहितच नव्हते. त्याआगोदर या मुलांनी पैसे आणून दिले. मुलाचे आई-वडील व शिक्षकांकडून चांगले संस्कार या मुलावर झाले, त्याने प्रामाणिकपणा दाखविल्याने मला पैसे मिळाले. मी त्यांचे ऋण कधीही विसरू शकणार नाही. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल मी त्यांना ड्रेस व स्कूल बॅग घेऊन देणार आहे.-  संजय गोमलाडू

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षणJalanaजालना