शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

उन्हापासून थंडावा मिळविण्यासाठी पोहायला गेलेल्या भावंडांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:54 IST

एकाच कुटूंबातील दोन मुलांचा दुदैर्वी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजूर (जालना ) : शेत तलावात पोहायला गेलेल्या दोन १६ वर्षीय युवकांचा तलावात बुडून करूण अंत झाल्याची दुदैर्वी घटना भोकरदन तालुक्यातील चांधई ठोंबरी येथे सोमवारी दुपारी दोन  वाजेच्या सुमारास घडली. एकाच कुटूंबातील दोन मुलांचा दुदैर्वी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

चांधई ठोंबरी येथील प्रकाश रामभाऊ वाघमारे यांच्या गट क्रमांक २४४ मधील शेतात शेत तलाव तयार करण्यात आलेला आहे. सोमवारी दुपारी त्यांचा मुलगा आकाश प्रकाश वाघमारे (१६), गौरव प्रभु वाघमारे (१६) हे दोघे भावंड अन्य मित्रांसह शेत तलावात पोहायला गेले होते. त्यांनी तलावात खाली- वर ऊतरण्यासाठी ठिबकची नळी लावलेली होती. यामध्ये आकाशला पोहोता येत होते. तर गौरव पोहने शिकत होता. दोघेही नळीच्या मदतीने पाण्यात ऊतरले. गौरवला पोहोता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळया खावू लागला. आकाशने त्याला धरून ठिबकच्या नळीने वर येण्याचा प्रयत्न केला मात्र नळी तुटल्याने दोघांच्या जीवनाची दोरी तुटली. 

यामधे गौरवने आकाशला मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. तलावाच्या वर असलेल्या दोन ते तिन मित्रांनी दोघे पाण्यात बुडत असल्याचे पाहून घाबरून तेथून पळ काढला.  मुले पळत सुटल्याने आसपासच्या नागरिकांनी विचारणा केली असता, त्यांनी सदर घटना सांगीतली. काही ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेवून दोन्ही मुलांना वर काढले. परंतु तो पर्यंत त्या दोघांचाही करूण अंत झाला होता. एकाच कुटूंबातील दोन मुलांचा करूण अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात होती. ऊत्तरीय तपासणीसाठी दोघांचे मृतदेह राजूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :JalanaजालनाDeathमृत्यूWaterपाणीagricultureशेती