शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कामात दिरंगाई करणाऱ्या १५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:02 IST

५० वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झालेल्या कामचुकार १५ कर्मचा-यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देसीईओ निमा अरोरा : कामात हलगर्जीपणा करणे भोवले

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ५० वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झालेल्या कामचुकार १५ कर्मचा-यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.कामात हलगर्जीपणा, वेळेवर उपस्थित न राहणे, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करणे, कामात दिरंगाई करणे, सोपवलेले काम विहित मुदतीत न करणे, परवानगी शिवाय गैरहजर राहणे, दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणे अशा विविध कारणांमुळे शासनास्तरावर माहिती सादर करण्यास विलंब लागतो. त्यामुळे ५० व ५५ वर्षं सेवा कालावधी पूर्ण झालेले अधिकारी व कर्मचारी कामचुकारपणा करीत असतील तर त्यांचे पुनर्विलोकन करून त्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याचे आदेश शासनाने सर्व शासकीय कार्यालयांना दिले आहे.त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सर्व विभाग प्रमुखांना कामचुकार कर्मचाºयांच्या कामाचे मुल्यमापन करून त्याबद्दलचा पुनर्विलोकन अहवाल मागितला होता. यात विविध विभागातील १५ कर्मचारी ५० वर्ष सेवा कालावधी पूर्ण झाले आढळले व ते कामात दिरंगाई करत असल्याचे समोर आले. या सर्व कर्मचाºयांना सीईओंनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तीन ते चार दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहे.संबंधितांचा खुलासा असमाधानकारक असल्यास किंवा खुलासा सादर न केल्यास त्यांना शासकीय सेवेतून सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे कामात दिरंगाई करणाºया कर्मचाºयांवर एक प्रकारे लगाम लागणार आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे कर्मचारी व अधिका-यांना आपली जबाबदारी व कामे विहित मुदतीत पूर्ण करावे लागणार आहेत.दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी काही महिन्यांपूर्वीच कामचुकार अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई केली होती. यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाºयांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवस सर्वच अधिकारी व कर्मचारी शिस्तबध्दपणे काम करत होते.पाच कर्मचा-यांवर होऊ शकते कारवाईमुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी अधिकारी व कर्मचा-यांनी कामात हलगर्जीपणा करू नये, असे आदेश दिले होते. परंतु, तरीही काही कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचे सीईओंच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सदरील कर्मचाºयांच्या कामकाजाचा अहवाल माघितला.दरम्यान, १५ कर्मचाºयांच्या कामकाजाचे मुल्यमापन केले असता, त्यातील पाच कर्मचाºयांचे काम असमाधानकारक असून, त्यांच्यावर मुदतपूर्व सेवानिवृत्तीची कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.

कामात दिरंगाई करणाºया जवळपास १५ कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहे. खुलासा सादर न करणाºया व असमाधानकारक काम असलेल्या कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल.-निमा अरोरा,मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जालना

टॅग्स :Jalanaजालनाzpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारी