शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

धक्कादायक ! एकाच महिन्यात २४ शेतकऱ्यांनी संपविली जीवन यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 1:16 PM

farmer suicide News : नैसर्गिक, सुलतानी संकट, शेतमालाला नसलेला भाव, कर्जाचा डोंगर अशा अनेक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला जीवनप्रवास थांबविला आहे.

ठळक मुद्देसात महिन्यांत ५० शेतकऱ्यांच्या आत्महत्याकोरोनामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

- दीपक ढोलेजालना : अनेक संकटांशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाचाही मुकाबला सुरू केला आहे. मात्र, असे असले तरी जूनच्या एकाच महिन्यात जिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. गत सात महिन्यांत ५० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. (  In a single month, 24 farmers completed their life journey) 

नैसर्गिक, सुलतानी संकट, शेतमालाला नसलेला भाव, कर्जाचा डोंगर अशा अनेक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला जीवनप्रवास थांबविला आहे. २००१ ते २०२१ या काळात तब्बल ७४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चौकशी केल्यानंतर यातील ६२९ पात्र, तर ११३ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात, यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या गेल्या. मात्र, यातील किती योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ झाला, यावर वाद-विवाद सुरूच आहे. असे असले तरी शेतकऱ्यांमागे लागलेले समस्यांचे शुक्‍लकाष्ठ काही संपलेले नाही. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी अशा संकटात शेतकरी कायमच अडकलेला आहे. यंदा तर कोरोनाच्या संकटातही शेतकरीच जास्त भरडला जात आहे. कोरोना काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. २०२० साली ८८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे, तर मागील सात महिन्यात ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या जून महिन्यात २४ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपविली असून, त्यापैकी ४६ आत्महत्या पात्र ठरविण्यात आले आहेत.

कोरोनामुळे शेतकरी अडचणीतरब्बी हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना या काळातील पीक एकतर कवडीमोल भावाने विकण्याची; तर काहींवर अक्षरश: फेकून देण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकरी या काळातही अडचणीत आला होता. देश लॉकडाऊन असताना शेतकरी आपल्या शेतातील माल विकावा कसा, या मानसिकतेत होते. यामुळेच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

सात महिन्यांत ५० शेतकऱ्यांच्या आत्महत्याजानेवारी ते जुलै या काळात जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ४६ शेतकरी आत्महत्या पात्र ठरल्या असून, ४ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. येणाऱ्या काळात शेती तसेच शेतकरी या वर्गाला कसा दिलासा देता येईल, याचा विचार होणे आता गरजेचे झाले आहे.

गेल्या सात महिन्यात झालेल्या आत्महत्यामहिना             एकूण आत्महत्याजानेवारी                        ०८फेबुवारी                         ०३मार्च                         ०४एप्रिल                         ०२मे                         ०४जून                         २४जुलै                         ०५ 

टॅग्स :Jalanaजालनाagricultureशेतीfarmer suicideशेतकरी आत्महत्याcorona virusकोरोना वायरस बातम्या