शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
2
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
3
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
4
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
5
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
6
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
8
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
9
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
10
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
11
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
12
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

शांतीगिरी महाराजांकडून जालना शहरात ‘राजकारणाचे शुद्धीकरण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 1:11 AM

वेरूळ येथील जय बाबाजी परिवाराचे प्रणेते श्री श्री १००८ शांतीगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्यात सोमवारी झालेल्या राजकारणाचे शुध्दीकरण कार्यक्रमाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वेरूळ येथील जय बाबाजी परिवाराचे प्रणेते श्री श्री १००८ शांतीगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्यात सोमवारी झालेल्या राजकारणाचे शुध्दीकरण कार्यक्रमाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शांतीगिरी महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राजकारण आणि राजकीय नेता कसा असावा यावर शांतीगिरी महाराजांनी सविस्तर मार्गदर्शन केले.जालना येथील जय बाबाजी परिवाराकडून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम सायंकाळी पार पडला. यावेळी भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे, त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून शंभर टक्के मतदान केलेच पाहिजे, मतदान करताना पैशांच्या आमिषाला बळी न पडताते योग्य व्यक्तीला करून ते सत्पात्री लागले पाहिजे यासह राजकीय नेता कसा असावा, यावरही महाराजांनी मते मांडली. वंशपरंपरागत नेता असण्याऐवजी तो कर्तृत्ववान असला पाहिजे. पक्षाशी एकनिष्ठ हवा की, देशाशी एकनिष्ठ हवा असे अनेक प्रश्न श्रोत्यांना विचारून त्यांच्याकडूनही यावर उत्तरे जाणली.यावेळी जालना येथील जय बाबाजी परिवाराचे प्रमुख दत्तात्रेय शिराळे, बालू चाटला, किशोर गरदास, कन्नी कटलू, सुरेश गुंटूक यांच्यासह वेरूळ येथील मठाचे सचिव रामनंद महाराज, काकासाहेब गोरेंची उपस्थिती होती. दरम्यान २००९ मध्ये शांतीगिरी महाराजांनी औरंगाबाद मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यामुळे ऐन लोकसभेपूर्वीच या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :Politicsराजकारणspiritualअध्यात्मिकSocialसामाजिक