शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

जालना जिल्ह्यात श्रावणसरींवर समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:43 IST

जालना जिल्ह्यातील गुरुवारी सर्वांना दमदार पाऊस पडेल, अशी आशा होती. परंतु श्रावणसरींवरच समाधान मानण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील गुरुवारी सर्वांना दमदार पाऊस पडेल, अशी आशा होती. परंतु श्रावणसरींवरच समाधान मानण्याची वेळ आली आहे. दिवसभर रिमझिम पाऊस पडल्याने जल प्रकल्पांना दमदार पावसाची आस कायम आहे.जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गुरूवारी दिवसभर रिमझिम पाऊस झाला. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात ९.५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्मिती होत असून, कमी- अधिक प्रमाणात रिमझिम पाऊस हजेरी लावत आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी पाणीटंचाई निवारण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात ९.५३ मिमी पाऊस झाला. यात जालना तालुक्यात ३ मिमी, बदनापूर २.८० मिमी, भोकरदन ११.६३ मिमी, जाफ्राबाद ८.४० मिमी, परतूर १९.६४ मिमी, मंठा ४.५० मिमी, अंबड १२.४३ मिमी तर घनसावंगी तालुक्यात १३.८६ मिमी पाऊस झाला. गुरूवारी जालना शहरासह परतूर, आष्टी, जाफराबाद, पारध, वालसावंगी, भोकरदनसह जिल्ह्याच्या विविध भागांत पाऊस झाला. दरम्यान, या पावसामुळे परतूर शहरातील सखल भागांत ठिकठिकाणी पाणी साचले होते.परतूरमध्ये २० मिमी पाऊसपरतूर : परतूर तालूक्यात सरासरी पावासाची नोंद २० मी.मी. झाली आहे. दुसऱ्या दिवशी गुरूवारीही पाऊस झाला. यात आष्टी महसूल मंडळात सर्वाधिक ३० मिमी, वाटूर ४ मिमी, परतूर २५ मिमी, आष्टी २४ मिमी, सातोना १५ मिमी असा एकूण १९.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.या पावसामुळे शहरातील रस्ते चिखलमय झाले होते. रस्त्याची दुरूस्ती न झाल्याने शहरवासियांमधून नाराजी व्यक्त होत आहे. चिखलातूनच सर्वांना वाट काढावी लागत आहे.

टॅग्स :RainपाऊसNatureनिसर्गweatherहवामान