शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जालना जिल्ह्यात श्रावणसरींवर समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:43 IST

जालना जिल्ह्यातील गुरुवारी सर्वांना दमदार पाऊस पडेल, अशी आशा होती. परंतु श्रावणसरींवरच समाधान मानण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील गुरुवारी सर्वांना दमदार पाऊस पडेल, अशी आशा होती. परंतु श्रावणसरींवरच समाधान मानण्याची वेळ आली आहे. दिवसभर रिमझिम पाऊस पडल्याने जल प्रकल्पांना दमदार पावसाची आस कायम आहे.जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गुरूवारी दिवसभर रिमझिम पाऊस झाला. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात ९.५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्मिती होत असून, कमी- अधिक प्रमाणात रिमझिम पाऊस हजेरी लावत आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी पाणीटंचाई निवारण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात ९.५३ मिमी पाऊस झाला. यात जालना तालुक्यात ३ मिमी, बदनापूर २.८० मिमी, भोकरदन ११.६३ मिमी, जाफ्राबाद ८.४० मिमी, परतूर १९.६४ मिमी, मंठा ४.५० मिमी, अंबड १२.४३ मिमी तर घनसावंगी तालुक्यात १३.८६ मिमी पाऊस झाला. गुरूवारी जालना शहरासह परतूर, आष्टी, जाफराबाद, पारध, वालसावंगी, भोकरदनसह जिल्ह्याच्या विविध भागांत पाऊस झाला. दरम्यान, या पावसामुळे परतूर शहरातील सखल भागांत ठिकठिकाणी पाणी साचले होते.परतूरमध्ये २० मिमी पाऊसपरतूर : परतूर तालूक्यात सरासरी पावासाची नोंद २० मी.मी. झाली आहे. दुसऱ्या दिवशी गुरूवारीही पाऊस झाला. यात आष्टी महसूल मंडळात सर्वाधिक ३० मिमी, वाटूर ४ मिमी, परतूर २५ मिमी, आष्टी २४ मिमी, सातोना १५ मिमी असा एकूण १९.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.या पावसामुळे शहरातील रस्ते चिखलमय झाले होते. रस्त्याची दुरूस्ती न झाल्याने शहरवासियांमधून नाराजी व्यक्त होत आहे. चिखलातूनच सर्वांना वाट काढावी लागत आहे.

टॅग्स :RainपाऊसNatureनिसर्गweatherहवामान